Mumbai Water Supply : मुंबईसाठी दिलासादायक बातमी! विहारनंतर तुळशी तलावही ओसंडून वाहू लागला

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला तुळशी तलाव (Tulsi lake) मंगळवारी (७ जुलै) रात्री ११.४३ वाजता पूर्ण भरून ओसंडून वाहू लागला आहे. यापूर्वी त्याच दिवशी रात्री ९ वाजता विहार तलावही भरून वाहू लागला होता. (Vihar Lake)


बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी तुळशी हा सर्वात लहान तलाव आहे. या तलावाची उपयुक्त जलसाठा क्षमता ८०४.६ कोटी लिटर (८०४६ दशलक्ष लिटर) असून येथून दररोज सरासरी १८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. (Mumbai Water Supply)



गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे तुळशी तलाव भरून वाहू लागला आहे. तुळशी तलावाचे अतिरिक्त पाणी पुढे विहार तलावात जाऊन मिळते.(Tulsi Lake Overflow)



महापालिकेच्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सात तलावांमधील एकूण पाणीसाठा सध्या एकूण क्षमतेच्या ४१.४३ टक्क्यांवर पोहोचला आहे.


सन १८७९ मध्ये सुमारे ४० लाख रुपयांच्या खर्चातून तुळशी तलावाची उभारणी करण्यात आली होती. हा तलाव बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर असून त्याचे पाणलोट क्षेत्र ६.७६ चौरस किलोमीटर आहे. (Water Stock Mumbai)





Comments
Add Comment

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील