नवी दिल्ली : राजस्थानातील श्रीगंगानगर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित सामूहिक बलात्कार आणि मानवी तस्करी प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) कठोर भूमिका घेतली आहे. आयोगाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून १५ दिवसांच्या आत झालेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल मागवला आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी बुधवारी या प्रकरणाची सुनावणी करून अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. (Rajasthan Gang-Rape Case)
आयोगाच्या अध्यक्षा यांनी माध्यमांना जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणात प्रशासन आणि पोलिसांची गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. त्यामुळे तपास लवकर पूर्ण करून वेळेत आरोपपत्र दाखल करण्यात यावे आणि न्यायालयात सुनावणी सुरू करून पीडितेला लवकर न्याय मिळवून द्यावा. आतापर्यंत एसआयटीने हॉटेल मालक, व्यवस्थापकांसह १८ आरोपींना अटक केली आहे. आयोगाने उर्वरित आरोपींनाही लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. (Rajasthan Gang-Rape Case)
कोलकाता : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धनशोधन प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत कारवाई करत तृणमूल काँग्रेसच्या ४४०.४२ कोटी रुपयांच्या बँक ठेवी ...
महिला आयोगाने जिल्हा प्रशासनाला १५ दिवसांच्या आत जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर आणि नोंदणी नसलेल्या हॉटेलांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसेच, एवढी मोठी घटना घडूनही स्थानिक पोलिसांची देखरेख व्यवस्था का अपयशी ठरली, याची चौकशी करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. (Rajasthan Gang-Rape Case)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इंडोनेशियातील तीन दिवसांचा अधिकृत दौरा पूर्ण करून बुधवारी जकार्ता येथून ऑस्ट्रेलियाकडे प्रस्थान ...
आयोगाच्या अध्यक्षा यांनी सोशल मीडियावर पीडितेशी संबंधित व्हिडिओ आणि इतर सामग्री तात्काळ हटविण्याचे तसेच ती प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत. याशिवाय, पीडितेची सुरक्षा, उपचार, पुनर्वसन आणि आर्थिक मदत तातडीने सुनिश्चित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. (Rajasthan Gang-Rape Case)




