पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर (Flood in Indrayani) आल्याने आळंदी शहरात जाणे सध्या सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Nashik : नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोर धरला असून घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. संभाव्य अतिवृष्टी आणि ढगफुटीच्या इशाऱ्याच्या ...
प्रशासनाने वारकऱ्यांना आळंदीऐवजी पुणे शहरात होणाऱ्या वारीमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे. तसेच (Flood in Indrayani) इंद्रायणी नदीपात्र, घाट परिसर आणि सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे. (Flood in Indrayani)
वारकऱ्यांना 'आहात तिथेच थांबण्याचे' उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आवाहन! पुणे : यंदाच्या आषाढी वारीच्या (२०२६) पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर ...





