कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अडचणीत सापडलेल्या तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी मानल्या जाणाऱ्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी पक्षातील सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे टीएमसीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींना नव्याने उधाण आले असून, बंगालच्या राजकारणात चर्चांना वेग आला आहे.
चंद्रिमा भट्टाचार्य यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती पक्षप्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पत्राद्वारे दिली आहे. या पत्रात त्यांनी पक्षातील सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्यांमधून मुक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इतकेच नव्हे, तर पक्षाच्या आर्थिक आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'स्वाक्षरी अधिकारी' (Authorised Signatory) या पदाचाही त्यांनी तत्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पंढरपूर : पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन व लोकार्पण ...
चंद्रिमा भट्टाचार्य या तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून, गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात आणि राज्य सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांची गणना केली जात होती. सरकार आणि पक्ष संघटना यांच्यातील समन्वय राखण्यात त्यांचे मोठे योगदान असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांचा अचानक झालेला राजीनामा हा केवळ संघटनात्मक बदल नसून, टीएमसीसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. (Mamata Banerjee)
विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीतील अपेक्षाभंगानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आणि नेतृत्वाविषयी विविध चर्चा सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशा परिस्थितीत चंद्रिमा भट्टाचार्य यांचा निर्णय पक्षातील अस्वस्थतेचे आणखी एक संकेत मानला जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याबाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Mamata Banerjee)
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर तृणमूल काँग्रेस किंवा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. पक्षाकडून राजीनामा स्वीकारण्यात आला आहे की नाही, याबाबतही स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत टीएमसीच्या संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Mamata Banerjee)
सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपूर्वी नोंदणी करण्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन मुंबई : बदलत्या हवामानामुळे ...
चंद्रिमा भट्टाचार्य यांच्या राजीनाम्यामुळे विरोधी पक्षांनीही टीएमसीवर टीकेची झोड उठवण्याची शक्यता आहे. आगामी काळात हा राजीनामा केवळ संघटनात्मक बदल ठरतो की बंगालच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Mamata Banerjee)




