Devendra Fadnavis : व्यापक चर्चेअंतीच आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कायदा लादायचा सरकारचा उद्देश नाही


मुंबई : अनुसूचित जातींच्या (SC) आरक्षण उपवर्गीकरणाबाबत घाईघाईने कोणताही कायदा लादण्याचा राज्य सरकारचा उद्देश नाही. या संवेदनशील विषयावर समाजातील सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन, व्यापक आणि सविस्तर चर्चेअंतीच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत मांडणी केली. कोणत्याही समाजघटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नसून मागे राहिलेल्यांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. उपवर्गीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मुंबईत समाजबांधवांचा मोठा मोर्चा निघाल्याच्या पार्श्वभूमीवर, 'बदर समिती'चा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्वांशी चर्चा केल्याशिवाय सरकारने कोणतेही विधेयक आणू नये, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका सभागृहासमोर स्पष्ट केली.सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातींमधील अधिक मागे राहिलेल्या घटकांना न्याय देण्याबाबत निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या याच निकालानुसार कर्नाटक आणि तेलंगणसारख्या काँग्रेसशासित राज्यांनी आपापल्या राज्यात उपवर्गीकरण करून कायदेही बनविले आहेत, याकडे मुख्यमंत्री फडणवीस (Chief Minister Fadnavis) यांनी विरोधी पक्षाचे लक्ष वेधले. मात्र, महाराष्ट्र सरकार कोणावरही निर्णय लादणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.



या प्रक्रियेच्या सद्यस्थितीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, उपवर्गीकरणाच्या अभ्यासासाठी राज्य सरकारने नेमलेल्या 'बदर समिती'चा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. या अहवालावर सर्व स्तरांतून सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासल्याने, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. सध्या या समितीमार्फत सूचना व हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यावर रीतसर सुनावण्या घेतल्या जातील. ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शक असेल आणि यात कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.




विरोधकांचा सभात्याग


मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणानंतर विधानसभा अध्यक्षांनी पुढील लक्षवेधी सूचना पुकारली. मात्र, हा विषय अतिशय गंभीर आणि संवेदनशील असल्याने विरोधकांनी यावर अधिक बोलू देण्याची मागणी लावून धरली. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात जोरदार गदारोळ झाला. अध्यक्ष पुढील कामकाजाकडे वळल्याने आणि विरोधकांना बोलण्याची मागणी मान्य न झाल्याने, अखेर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवत सभात्याग केला.

Comments
Add Comment

Jalgaon : जळगावमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार; घटनेचे व्हिडीओ काढले अन..., 14 जण ताब्यात

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाणे (Fatehpur Police Station) हद्दीत महिलेवर

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

AI Smart Glasses : एआय स्मार्ट चष्म्यांचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकार स्थापन करणार तज्ज्ञ समिती

AI Smart Glasses : मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित स्मार्ट चष्मे, स्मार्ट गॉगल्स आणि इतर वेअरेबल (अंगावर परिधान करता

Nashik Suicide News : ट्रॅव्हलचालकाची आत्महत्या, कर्ज वसुलीच्या छळाला कंटाळून विषप्राशन

Nashik Suicide News : कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाने फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची

Nanded Gurudwara Reform : नांदेड गुरुद्वारा सुधारणा कायदा स्थगित

मुंबई : नांदेड येथील ऐतिहासिक व पवित्र श्री हजूर अबचलनगर सचखंड गुरुद्वाराच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत १९५६ च्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण