Farm Loan Waiver : ५ जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार

- कृषीमंत्री दत्ता भरणे; ५६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ


मुंबई : राज्यातील बहुप्रतीक्षित शेतकरी कर्जमाफीच्या (Farm Loan Waiver) वितरणाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला असून, आगामी ५ जुलैपासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी विधानसभेत दिली. पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.


यापूर्वी ३० जून रोजी कर्जमाफीची रक्कम दिली जाईल असे संकेत होते, मात्र तांत्रिक प्रक्रिया आणि राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर आता ५ जुलैनंतर प्रत्यक्ष निधी वाटप केले जाईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यातील ५६ लाख २४ हजार शेतकऱ्यांना तब्बल ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे.



मंत्री भरणे म्हणाले की, राज्यातील १ लाख ११ हजार शेतकऱ्यांना नव्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून खते उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या ॲपचा वापर करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्यास त्या तातडीने सोडवल्या जातील. तसेच, केंद्र सरकार आणि अन्य महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी 'फार्मर आयडी' अत्यंत गरजेचा आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार केले जाणार असून, यासाठी गावोगावी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.






१ हजार ११९ खतविक्री परवाने रद्द


राज्यात खते आणि बियाणांची कोणतीही टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही देताना मंत्र्यांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याचे सांगितले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राज्यातील १ हजार ११९ खतविक्री दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच, कापूस उत्पादकांकडून मागणी होत असलेल्या 'एचटीबीटी' कापूस बियाण्यांबाबत बोलताना, या बियाण्यांना केंद्राकडून अद्याप अधिकृत परवानगी मिळालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, लोकप्रतिनिधींनी तालुका स्तरावर 'कृषीभवन' उभारण्याची मागणी केली असून, यावर सरकारकडून तातडीने सकारात्मक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.




१७ जिल्ह्यांतील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार


काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. या आपत्तीवर मोठी घोषणा करताना कृषीमंत्र्यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे राज्यातील १७ जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या बाधित क्षेत्रांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, पंचनाम्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. या अवकाळी पावसात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या सर्व बाधित शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Nashik : पंढरपूर वारीतील वारकऱ्यांसाठी दोस्ती फाउंडेशनचा मदतीचा हाथ, भव्य अन्नदान व प्रसाद वाटप

Nashik : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा मानत दोस्ती फाउंडेशन

Rajvardhini Chavan: वयाच्या अवघ्या ३ वर्षे ४ महिन्यांत ऐतिहासिक पराक्रम; बाल दुर्गप्रेमी राजवर्धिनी चव्हाणने सर केले तब्बल १०० गड-कोट

पुणे: सह्याद्रीच्या कडेकपारीत आणि दुर्गम वाटांवर वयाच्या अवघ्या ३ वर्षे आणि ४ महिन्यांच्या बालवयात एका

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Barshi Crime : माता न तू वैरिणी! १० महिन्यांच्या चिमुकलीची आईकडून हत्या

बार्शीत थरकाप उडवणारी घटना, आईने चिमुकलीची गळा आवळून केली हत्या   सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शी

Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव

Beed Pakistani Connection : बीडमधील बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; एटीएसची धडक कारवाई

बीड : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) (Maharashtra ATS) केलेल्या धडक तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील