Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे आकारणाऱ्या विक्रेत्यांवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने (Bhusawal Division of the Railways) कारवाईचा बडगा उगारला आहे. रेल्वे स्थानकांवरील खानपान स्टॉल, ट्रॉली विक्रेते तसेच अधिकृत विक्रेत्यांची नियमित आणि आकस्मिक तपासणी करून अनियमितता आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.



रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका


रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना आवश्यक खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी योग्य दरात उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, काही ठिकाणी बाटलीबंद पाणी तसेच खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी छापील कमाल किरकोळ किंमत अर्थात एमआरपीपेक्षा अधिक दर आकारला जात असल्याच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. विशेषतः गर्दीच्या वेळेत किंवा प्रवाशांना पर्याय उपलब्ध नसताना जादा दर आकारण्याचे प्रकार घडत असल्याने रेल्वे प्रशासनाने तपासणी अधिक प्रभावी करण्यावर भर दिला आहे.



नियमबाह्य कार्यपद्धती आढळल्यास कारवाई


प्रवाशांकडून रेल्वे मदतच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल घेतली जाते. तक्रारीच्या आधारे संबंधित स्थानकावरील खानपान स्टॉल किंवा विक्रेत्याची चौकशी करण्यात येते. याशिवाय तक्रारींपुरतेच तपासणीचे स्वरूप मर्यादित न ठेवता वाणिज्य विभागाच्या पथकांकडून विविध स्थानकांवर अचानक तपासण्या केल्या जात आहेत. या तपासणीदरम्यान विक्रेत्याकडे असलेल्या खाद्यपदार्थांचे दर, पाण्याच्या बाटल्यांवरील एमआरपी, विक्रीची पद्धत तसेच इतर व्यावसायिक नियमांचे पालन केले जात आहे का, याची पाहणी केली जाते. निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारणे, नियमबाह्य पद्धतीने विक्री करणे किंवा अन्य व्यावसायिक अनियमितता आढळल्यास संबंधित विक्रेत्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येते.



लाखो रुपयांचा दंड वसूल


एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांकडून तब्बल ७ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रवाशांकडून जादा दर आकारण्याच्या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून केवळ आर्थिक दंडावर कारवाई थांबवली जात नाही तर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विक्रेत्यांवर रेल्वेच्या नियमानुसार इतर शिस्तभंगाची कारवाईही केली जाऊ शकते.



...अन् मगच वस्तू खरेदी करावी


दरम्यान, प्रवाशांनी वस्तू खरेदी करताना त्यावरील एमआरपी तपासावी. निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे आकारल्यास प्रवाशांनी गप्प न बसता रेल्वे मदतच्या माध्यमातून तातडीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तक्रारीसोबत पावती, विक्रेत्याचे नाव, स्टॉलची माहिती किंवा जादा रक्कम आकारल्याचा तपशील दिल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करणे प्रशासनाला अधिक सोपे होणार आहे. नियमबाह्य दर आकारणाऱ्या विक्रेत्यांवर यापुढेही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी