Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे आकारणाऱ्या विक्रेत्यांवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने (Bhusawal Division of the Railways) कारवाईचा बडगा उगारला आहे. रेल्वे स्थानकांवरील खानपान स्टॉल, ट्रॉली विक्रेते तसेच अधिकृत विक्रेत्यांची नियमित आणि आकस्मिक तपासणी करून अनियमितता आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
'मातोश्री' आणि 'शिवतीर्थ'वरून सोयीची भूमिका https://prahaar.in/2026/08/11/virar-fake-currency-major-fake-currency-racket-busted-in-virar-counterfeit-notes-worth-%e2%82%b91-crore-seized-plot-to-sell-them-for-%e2%82%b930-lakh-foiled/ मुंबई : झारखंडची राजधानी रांची येथे ...
रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका
रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना आवश्यक खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी योग्य दरात उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, काही ठिकाणी बाटलीबंद पाणी तसेच खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी छापील कमाल किरकोळ किंमत अर्थात एमआरपीपेक्षा अधिक दर आकारला जात असल्याच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. विशेषतः गर्दीच्या वेळेत किंवा प्रवाशांना पर्याय उपलब्ध नसताना जादा दर आकारण्याचे प्रकार घडत असल्याने रेल्वे प्रशासनाने तपासणी अधिक प्रभावी करण्यावर भर दिला आहे.
Nashik : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानने व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्यात ...
नियमबाह्य कार्यपद्धती आढळल्यास कारवाई
प्रवाशांकडून रेल्वे मदतच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची प्रशासनाकडून दखल घेतली जाते. तक्रारीच्या आधारे संबंधित स्थानकावरील खानपान स्टॉल किंवा विक्रेत्याची चौकशी करण्यात येते. याशिवाय तक्रारींपुरतेच तपासणीचे स्वरूप मर्यादित न ठेवता वाणिज्य विभागाच्या पथकांकडून विविध स्थानकांवर अचानक तपासण्या केल्या जात आहेत. या तपासणीदरम्यान विक्रेत्याकडे असलेल्या खाद्यपदार्थांचे दर, पाण्याच्या बाटल्यांवरील एमआरपी, विक्रीची पद्धत तसेच इतर व्यावसायिक नियमांचे पालन केले जात आहे का, याची पाहणी केली जाते. निर्धारित दरापेक्षा अधिक रक्कम आकारणे, नियमबाह्य पद्धतीने विक्री करणे किंवा अन्य व्यावसायिक अनियमितता आढळल्यास संबंधित विक्रेत्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येते.
Nashik Crime News : सिन्नर तालुक्यातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वावी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घडली असून ...
लाखो रुपयांचा दंड वसूल
एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांकडून तब्बल ७ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रवाशांकडून जादा दर आकारण्याच्या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून केवळ आर्थिक दंडावर कारवाई थांबवली जात नाही तर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विक्रेत्यांवर रेल्वेच्या नियमानुसार इतर शिस्तभंगाची कारवाईही केली जाऊ शकते.
Nashik Crime News : नाशिकच्या पर्यटनाला टवाळखोरांची नजर लागल्याचं चित्र आहे. भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा थरकाप उडवणारा प्रकार आजही ...
...अन् मगच वस्तू खरेदी करावी
दरम्यान, प्रवाशांनी वस्तू खरेदी करताना त्यावरील एमआरपी तपासावी. निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे आकारल्यास प्रवाशांनी गप्प न बसता रेल्वे मदतच्या माध्यमातून तातडीने तक्रार नोंदवावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तक्रारीसोबत पावती, विक्रेत्याचे नाव, स्टॉलची माहिती किंवा जादा रक्कम आकारल्याचा तपशील दिल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करणे प्रशासनाला अधिक सोपे होणार आहे. नियमबाह्य दर आकारणाऱ्या विक्रेत्यांवर यापुढेही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.