Friday, June 26, 2026

Mayank Lohar Death Case : '१०० प्रवासी होते, तरी मयंकला वाचवायला कुणी पुढे आलं नाही'; मयंक लोहार प्रकरणावर अभिनेते स्वप्नील राजशेखर यांचा सवाल

Mayank Lohar Death Case : '१०० प्रवासी होते, तरी मयंकला वाचवायला कुणी पुढे आलं नाही'; मयंक लोहार प्रकरणावर अभिनेते स्वप्नील राजशेखर यांचा सवाल

मुंबई : मुंबई लोकल (Mumbai Local) ही शहराची 'लाईफलाईन' (Lifeline) म्हणून ओळखली जाते. मात्र, विरार लोकल (Virar Local) मध्ये घडलेल्या मयंक लोहार (Mayank Lohar Murder Case) हत्याकांडाने संपूर्ण राज्य हादरले आहे. अवघ्या २२ वर्षीय मयंक लोहारची धावत्या लोकलमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत असताना, मराठी अभिनेते स्वप्नील राजशेखर (Swapnil Rajshekhar) यांनीही सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

पावसामुळे डब्यात पाणी उडत असल्याने ट्रेनचा दरवाजा (Train Door) उघडा ठेवायचा की बंद, यावरून प्रवाशांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने मयंक लोहारवर चाकूने हल्ला करत त्याची हत्या केली. या घटनेमुळे विरारमधील लोहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्वप्नील राजशेखर यांनी म्हटलं, "रेल्वेच्या डब्यात किमान शंभर लोक असतील... घटनेचे व्हिडीओ (Videos) काढले गेले, पण कुणी मयंकला मदत केली नाही किंवा खुन्याला पकडण्याचा प्रयत्नही केला नाही. ही बाब तितकीच गंभीर आहे."

त्यांच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने, "त्या जागी एखादी मुलगी असती तर काही जण हिरोगिरी दाखवायला पुढे आले असते," अशी टिप्पणी केली. त्यावर उत्तर देताना स्वप्नील यांनी एका अलीकडील घटनेचं उदाहरण दिलं. त्यांनी सांगितलं की, एका हत्यारबंद हल्लेखोरापासून (Attacker) एका धाडसी युवकाने आपल्या बॅगच्या (Bag) साहाय्याने मुलीचा बचाव केला. त्यानंतर इतर प्रवासीही पुढे आले आणि त्यांनी मिळून हल्लेखोराला पकडलं.

याच मुद्द्यावर भाष्य करत स्वप्नील म्हणाले, "मयंकच्या प्रकरणात आरोपी ट्रेनमधून उतरून स्टेशनबाहेर निघून गेला. पोलिसांनी (Police) तत्परता दाखवत सुमारे १२ तासांत त्याला अटक केली. पण डब्यातील प्रवाशांनी आरोपी खाली उतरल्यानंतर आरडाओरडा करून इतरांना सावध का केलं नाही? स्टेशनवरच त्याला अडवण्याचा प्रयत्न का झाला नाही?"

मयंक लोहार हत्याप्रकरणी (Mayank Lohar Murder Case) सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, प्रवाशांनी संकटाच्या वेळी केवळ व्हिडीओ शूट (Video Recording) करण्याऐवजी मदतीसाठी पुढे यावं, अशी भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >