Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा (Rain) जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


कोकण (Konkan) विभागात पावसाचा जोर कायम राहणार असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह (Thunderstorm), वादळी वाऱ्यांसह हलका ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विशेषतः सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.



पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


मराठवाड्यात (Marathwada) छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून सर्व संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.


उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. विदर्भात (Vidarbha) अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.



हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, तर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे

Nanded Suicide : स्टेटस ठेवलं अन् शिक्षकाची दोन मुलांसह आत्महत्या; पोलीस तपास सुरु

नांदेडमध्ये शिक्षकाची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या; व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे खळबळ नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यातून