Maharashtra Rain Alert : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : राज्यात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय झाला असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा (Rain) जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


कोकण (Konkan) विभागात पावसाचा जोर कायम राहणार असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह (Thunderstorm), वादळी वाऱ्यांसह हलका ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विशेषतः सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.



पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


मराठवाड्यात (Marathwada) छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून सर्व संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.


उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. विदर्भात (Vidarbha) अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.



हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांत पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, तर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बदलत्या हवामानामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "