MLA Nilesh Rane : उद्धव ठाकरेंनी आधीच खबरदारी घ्यायला हवी होती : आमदार निलेश राणे

मुंबई : ऑपरेशन टायगर अंतर्गत ६ खासदारांनी बंडखोरी करीत, शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे खबदरारी म्हणून उद्धव ठाकरेंनी सोमवारी सर्व आमदारांची बैठक घेतली. त्यावर आमदार निलेश राणे यांनी टीका केली असून, "उद्धव ठाकरे यांनी ही खबरदारी आधीच घ्यायला हवी होती. आधी त्यांनी पक्षावर लक्ष दिले नाही. पायाखालची जमीन निसटून गेल्यानंतर आता कसली खबरदारी घेताहेत", असा टोलाही त्यांनी लगावला.



मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. उबाठा गटातील बंडखोर खासदारांच्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारले असता आ. राणे म्हणाले, "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत प्रत्येकाला मानसन्मान मिळतो. त्यांच्या आधीच्या पक्षात (उबाठा) मानसन्मान नव्हता, कोणी काही ऐकून घेत नव्हते, नेते भेटत नव्हते. त्यामुळे चीड निर्माण होणारच ना. इकडे एकनाथ शिंदे २४ तास उपलब्ध असतात, सर्वांना भेटतात, सगळ्यांना न्याय देतात. माझ्यासारखा १० वर्षे प्रक्रियेच्या बाहेर असलेला माणूस आज आमदार झाला, तो शिंदे साहेबांमुळेच", असेही त्यांनी सांगितले.



उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचे नेतृत्व स्वीकारण्यास सज्ज झालेले खासदार




  1. ओमराजे निंबाळकर, धाराशिव

  2. संजय जाधव, परभणी

  3. संजय दीना पाटील, ईशान्य मुंबई

  4. संजय देशमुख, यवतमाळ - वाशिम

  5. नागेश आष्टीकर - हिंगोली

  6. भाऊसाहेब वाकचौरे - शिर्डी


उबाठाची राजकीय ताकद


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात शिउबाठा किंवा उबाठा या पक्षाची राजकीय ताकद हळू हळू कमी होत असल्याचे चित्र आहे. उबाठाचे लोकसभेत नऊ खासदार होते, त्यापैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. या गटाला लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिली आहे. आता हा गट सभागृहात स्वतंत्र बसेल. लोकसभाध्यक्षांच्या निर्णयामुळे लोकसभेत उबाठा अतिशय कमकुवत झाल्याचे चित्र आहे.



उबाठाच्या राज्यसभेतील खासदारांची संख्या : १




  1. संजय राऊत



उबाठाच्या लोकसभेतील खासदारांची संख्या : ३




  1. अरविंद सावंत

  2. अनिल देसाई

  3. राजाभाऊ वाजे

Comments
Add Comment

Jasprit Bumrah : बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार ? दुखापतीमुळे निवड समितीसमोर पर्यायांचा प्रश्न

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) १५ ऑगस्टपासून गाले येथे सुरू होणाऱ्या

Supreme Court : व्यभिचार सिद्ध झाल्यास पत्नी पोटगीस अपात्र, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली : पत्नी व्यभिचारात राहत असल्याचे पतीकडून स्पष्टपणे सिद्ध झाल्यास, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५

India Envoy Warns Pakistan : "आधी दहशतवाद संपवा, आणि नंतरच..."!पाकिस्तानला भारताचा कडक इशारा; राजदूत विनय क्वात्रा यांचे स्पष्ट शब्द

नवी दिल्ली : पाकिस्तानने द्विपक्षीय संबंध सुधारायचे असतील, तर सर्वप्रथम आपल्या भूमीवरील दहशतवादाचा संपूर्ण

Justice Anu Grover Baliga : न्यायमूर्ती अनु ग्रोवर बलीगा यांची बदली, नीट पेपरफुटीची सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सुनावणी

नवी दिल्ली : देशभरात प्रश्नपत्रिका फुटीच्या वाढत्या प्रकरणांवरून आंदोलने झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी

Delhi High Court : 'लंच ब्रेक'मध्ये झालेला अपघातही कामाचाच भाग, कर्मचारी भरपाईस पात्र

नवी दिल्ली : कर्मचारी भरपाई कायद्याची व्याख्या करताना उच्च न्यायालयाने एक अत

Fadnavis : 'माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल'

पुणे : माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब