Solicitor General Tushar Mehta: सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या तीन वर्षांसाठी फेरनियुक्तीसाठी मंजुरी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून आणखी तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. ही नियुक्ती १ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे. त्यांची ही तिसरी पुनर्नियुक्ती असून, यापूर्वी त्यांचा कार्यकाळ दोनदा वाढवण्यात आला होता.



कार्मिक व प्रशिक्षण विभाग (डीओपीीटी) यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) देशाचे दुसरे सर्वोच्च विधी अधिकारी म्हणून तुषार मेहता यांना पदावर कायम ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आदेशात नमूद करण्यात आले आहे की, तुषार मेहता यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून आणखी तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आली असून ती १ जुलै २०२६ पासून किंवा पुढील आदेशापर्यंत, यापैकी जे आधी लागू होईल, तेव्हापासून प्रभावी राहील.


अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून सेवा दिल्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये तुषार मेहता यांची सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने १ जुलै २०२० पासून प्रभावी होणाऱ्या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी तसेच २०२३ मध्ये त्यांची पुन्हा नियुक्ती केली होती. नव्या मुदतवाढीसह त्यांनी सॉलिसिटर जनरल म्हणून जवळपास आठ वर्षे पूर्ण केली असून, नव्या कार्यकाळाच्या अखेरीस त्यांची या पदावरील सेवा ११ वर्षांची होईल. त्यामुळे ते देशाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या विधी अधिकाऱ्यांपैकी एक ठरणार आहेत.



सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालय तसेच विविध उच्च न्यायालयांमध्ये अनेक महत्त्वाच्या घटनात्मक, धोरणात्मक आणि फौजदारी प्रकरणांमध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व केले आहे.मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सर्वोच्च न्यायालयासाठी कार्यरत असलेल्या पाच अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) यांचीही आणखी तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती मंजूर केली आहे.विक्रमजीत बॅनर्जी आणि के. एम. नटराज यांची १ जुलै २०२६ पासून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.एस. व्ही. राजू, एन. वेंकटरामन आणि ऐश्वर्या भाटी यांची ३० जून २०२६ पासून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.याशिवाय, स्वतंत्र निर्णयात मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने दिल्ली उच्च न्यायालयासाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांच्या पुनर्नियुक्तीलाही मंजुरी दिली आहे. त्यांचा कार्यकाळ १ जुलै २०२६ पासून सहा महिन्यांसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत, यापैकी जे आधी लागू होईल, तेव्हापर्यंत प्रभावी राहणार आहे.

Comments
Add Comment

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत

PM Narendra Modi : 'ही घटना अत्यंत दुःखद...' व्हिएतनाम बोट दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला तीव्र शोक

व्हिएतनाम : व्हिएतनाममधील 'फू क्वोक' बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याची हृदयद्रावक घटना समोर

Vietnam Boat Accident : मोठी बातमी! व्हिएतनाम बोट दुर्घटनेत २१ जणांना वाचवण्यात यश, १५ भारतीयांचा मृत्यू; दूतावासाकडून तातडीची मदत

व्हिएतनाम : व्हिएतनाममधील (Vietnam boat accident)अतिशय लोकप्रिय अशा 'फू क्वोक' (Phu Quoc) बेटाजवळ पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांवर

bus conductor arrested mangaluru : "मागच्या सीटवर या..." चालत्या बसमध्ये विद्यार्थिनींसमोर विकृत कंडक्टरचे अश्लील कृत्य; मंगळुरूतील घृणास्पद कृती!

मंगळुरू : कर्नाटकच्या (Karnatak) मंगळुरू (Mangluru) शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि महिलांच्या सुरक्षिततेवर मोठे