Trimbakeshwar : अखेर त्र्यंबकेश्वरवर वरुणराजाची कृपा ! पावसाची जोरदार हजेरी

Trimbakeshwar : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्र्यंबकेश्वरकरांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. शनिवारी दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावत संपूर्ण परिसराला झोडपून काढले. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकरी आणि नागरिकांमध्ये या पावसामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



नागरिकांना मोठा दिलासा


यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने पेरण्यांचे नियोजन रखडले होते. पावसाअभावी बळीराजा हवालदिल झाला होता. मात्र दुपारनंतर अचानक आभाळ दाटून आले आणि काही क्षणांतच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.



पावसाचे पाणी साठवण्यासाठी महिलांची लगबग


त्र्यंबकेश्वर शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पिण्याचे आणि घरगुती वापराचे पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पाऊस सुरू होताच अनेक महिलांनी घराबाहेर धाव घेत छतावरून वाहणारे पावसाचे पाणी ड्रम, बादल्या आणि विविध भांड्यांमध्ये साठवण्यास सुरुवात केली.


हा पाऊस पुढील काही दिवस कायम राहिला तर पाणीटंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे, मृगाच्या या पहिल्या दमदार सरीमुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून खरीप हंगामासाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.

Comments
Add Comment

Indian Railways : लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्यांच्या मार्गात बदल

लोणावळा - कर्जत मार्गावर दरड कोसळल्यामुळे दिनांक १७ जुलै २०२६ पर्यंत काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट/ शॉर्ट ओरीजनेट/

Moshi Incident : मोशी दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर; १७ जणांना बाहेर काढण्यात यश

पिंपरी  : मोशी येथील कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत मृतांचा आकडा सहावर

Donald Trump : हजार क्षेपणास्त्रे तयार;इराणला ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण वळणावर आले असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून,

Heatwave in India : उष्णतेच्या विळख्यात भारतातील १४ शहरे

जागतिक धोकादायक ५० शहरांच्या यादीत पुणे, नागपूरचा समावेश; अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर नवी दिल्ली : शहरातील सतत

Ashish Shelar : लोककलांच्या धोरणाच्या बळकटीकरणासाठी समिती स्थापन करणार

सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार झाले आहे, त्यामध्ये लोककलांचा विचार