Parabharani : मंदिराचे सभामंडप कोसळले आणि होत्याचे नव्हते झाले... धक्कादायक घटनेचे इत्यंभूत वृत्त

परभरणी : मानवत तालुक्यातील यशवाडी परिसरात हनुमान मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या मंदिराच्या सभामंडपाचे छत कोसळून मोठी दुर्घटना झाली. सभामंडपाचे छत कोसळल्यामुळे चार भाविकांचा मृत्यू झाला. छताखाली दबल्यामुळे जखमी झालेल्या ३१ जणांवर उपचार सुरू आहेत.


हनुमान मंदिरात शनिवार २० जून रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी झाली होती. कार्यक्रम सुरू असताना मंदिराच्या सभामंडपाचे छत कोसळले. अनेक भाविक छताखाली दबले.



घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी पोहोचली. बचावकार्य सुरू करण्यात आले.ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी रुग्णवाहिका तसेच निवडक खासगी वाहनांची मदत घेण्यात आली. दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी मंडपाच्या संरचनेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.






कीर्तनासाठी जमली होती हजारोंची गर्दी


मंदिरात धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील तसेच बाहेरील गावांमधून मोठ्या संख्येने भाविक कार्यक्रमासाठी दाखल झाले होते. मंडपात मोठी गर्दी असताच मंडपाचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली . अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


तात्काळ बचाव आणि मदत


दुर्घटनेनंतर तातडीने आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना घटनास्थळावर प्राथमिक उपचार देऊन आरपी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. पोलीस, महसूल प्रशासन, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवक बचावकार्यात सहभागी झाले असून ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का याची तपासणी सुरू आहे. मृत आणि जखमींची अधिकृत यादी प्रशासनाकडून जाहीर करण्याचे काम सुरू आहे.


 




मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख


परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथे हनुमान मंदिराच्या निर्माणकार्य सुरू असलेल्या छताचा भाग कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेतील जखमींवर उपचार केले जात आहेत. स्थानिक प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी असून मदत आणि बचावकार्य सुद्धा वेगाने सुरु आहे.

Comments
Add Comment

Women Empowerment : महिला सक्षमीकरणासाठी महसूल विभागाचा पुढाकार

शासकीय पडीक जमिनी आता भाडेपट्ट्याने महिला बचत गटांना 'राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना' सुरू चारा आणि बांबू

Return of the Monsoon: सुस्तावलेला पाऊस पुन्हा सक्रीय, महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार

Monsoon Update: गेल्या दोन आठवड्यांपासून देशातील विविध राज्यांमध्ये मान्सूनची प्रगती मंदावली होती, ज्यामुळे पावसाची तूट

Agriculture Minister Dattatray Bharne : राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरणः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्यातील ९०.८५

Ahilyanagar : धरणांतील पाणी ३० सप्टेंबरपर्यंत पिण्यासाठी राखीव; बेकायदा पाणीउपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश

Ahilyanagar :  एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन धरणांतील

Ahilyanagar : वारीच्या नियोजनासाठी दिंड्यांची माहिती २५ जूनपर्यंत द्या; पाणी बचतीचे मंत्री विखे पाटील यांचे आवाहन

Ahilyanagar : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दिंड्या आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक

Pavanraje Nimbalkar Murder Case : पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष

पवनराजे हत्याकांडाचा २० वर्षांनंतर निकाल; माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाचे