Bhiwandi building collapsed : भिवंडी इमारत दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना आणि जखमींना मदत जाहीर

भिवंडी : ठाणे (Thane) जिल्ह्यातील भिवंडीत (Bhiwandi) भंडारी कंपाऊंड परिसरातील गंगाराम वाडी येथे कोहिनूर (Kohinoor) इमारत कोसळली (building collapsed). या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता दहा वर पोहोचला आहे. मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफच्या टीम मदतकार्य करत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (A four-storey residential building collapsed in Bhiwandi, Thane district near Mumbai)



इमारत धोकादायक स्थितीत होती. शिवाय कोहिनूर इमारतीच्या ए विंगमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते. यामुळे काही रहिवाशांनी तात्पुरते वास्तव्याचे ठिकाण बदलले होते. पण काही रहिवासी इमारतीतच वास्तव्यास होते. तसेच काही कामगार पण इमारतीत होते. दुर्घटना झाली त्यावेळी हे सर्व जण ढिगाऱ्याखाली दबले. यामुळेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली.



काही मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटली आहे त्यांची नावं प्रशासनाने जाहीर केली आहेत.


१) शमीम शेख वय ३२
२) रंजीत सिंग वय ४५
३) मिराज रसूल शेख वय ३४
४) संतोष कुमार पांडे वय ४२ ( नातेवाईक - अंकित पांडे 9511795611)
५) शमीम अन्सारी वय ३० ( नातेवाईक -शाहिद अन्सारी 9175169964)
६) राकेश पासवान वय अंदाजे २५ ते ३०
७) मुकेश पासवान वय अंदाजे ३० ते ३५
८) अशोक पासवान वय अंदाजे ४० ते ५०
९) पुरुष, ओळख पटलेली नाही
१०) ओळख पटलेली नाही






अतिधोकादायक इमारतींमधून नागरिकांना बाहेर काढण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना


महापालिकेची नोटीस असतानाही दुरुस्तीचे काम सुरू ठेवणाऱ्या कंत्राटदारावर तत्काळ फौजदारी कारवाई करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. त्यांनी दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केले. कोहिनूर इमारतीचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मृतांना श्रद्धांजली वाहिली.




Comments
Add Comment

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! पुढील ३ दिवसांचा हवामान अंदाज जारी

राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,