Maharashtra Rain : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट, नाशिक-नंदुरबारमध्ये शाळांना सुट्टी

मुंबई : राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, 1 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. दक्षिण कोकण आणि गोवा परिसरातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain)



'या' जिल्ह्यांता ऑरेंज अलर्ट जारी


रायगड, नाशिक घाट परिसर आणि पुणे घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर तसेच विदर्भातील चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट भागात सततच्या पावसामुळे दरडी कोसळण्याचा आणि वाहतुकीवर परिणाम होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करावा, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. (Yellow Alert)



नाशिककरांना सावधानतेचा इशारा


नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आल्याने मालेगाव, नांदगाव, बागलाण, इगतपुरी, कळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आठवडी बाजार, जत्रा, मेळावे आणि गर्दीचे कार्यक्रम पुढे ढकलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


नंदुरबार जिल्ह्यातही रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



मुंबई शहरात रिमझिम


दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात आज दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शहरात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. समुद्रही खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने डहाणू ते श्रीवर्धनदरम्यानच्या बंदरांवर स्थानिक सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. (Monsoon)




Comments
Add Comment

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा

Aniket Nikam : ‘भाषण विसरणाऱ्या अमित ठाकरेंनी आधी स्वतःचे कर्तृत्व पाहावे’; भाजप प्रवक्ते अनिकेत निकम यांचा टोला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम

CM Devendra Fadnavis : गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे मुंबई : महाराष्ट्राचा

Devendra Fadnavis : नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुटकेसाठी केंद्राशी चर्चा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; कुटुंबीयांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधण्याचे