Health Minister Prakash Abitkar : महात्मा फुले आणि आयुष्मान भारत योजनेच्या रुग्णांना मिळणार ‘वेलकम किट’

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर; मंजुरीसाठी लागणारा कालावधी कमी करण्याबाबत सकारात्मक


मुंबई : राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांना आता अधिक सुलभ आणि सन्मानजनक सेवा मिळणार आहे. या योजनांनुसार उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचे खास 'वेलकम किट' देऊन स्वागत केले जाईल, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी केली.(PM Kisan Yojana)


मुंबईतील आरोग्य भवन येथे झालेल्या अंगीकृत रुग्णालयांच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत या विशेष 'वेलकम किट'चे लोकार्पण करण्यात आले. या वेळी रुग्णालयांच्या विविध तांत्रिक अडचणींवर चर्चा करताना, उपचारापूर्वीच्या पूर्व-मंजुरीसाठी लागणारा कालावधी कमी करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासनही आरोग्य मंत्र्यांनी दिले. पात्र लाभार्थ्यांना कोणतीही आर्थिक मागणी न करता पूर्णपणे मोफत आणि दर्जेदार उपचार मिळवून देणे ही सर्व संबंधित यंत्रणांची सामूहिक जबाबदारी असल्याचे मंत्री आबिटकर यांनी या वेळी स्पष्ट केले.(PM Kisan Yojana)


आरोग्य भवनातील या बैठकीला राज्यस्तरीय अधिकारी, शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांचे प्रतिनिधी आणि विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले की, गरीब रुग्णांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात 'आरोग्यमित्र' हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे आरोग्यमित्रांची नियुक्ती, त्यांचे विशेष प्रशिक्षण आणि क्षमता विकास यावर सरकारने आता अधिक भर दिला आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आवश्यक ते मार्गदर्शन, कागदपत्रांची मदत आणि योग्य सुविधा मिळवून देण्यासाठी आरोग्यमित्रांनी अधिक संवेदनशीलतेने कार्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत पात्र रुग्णाला उपचार नाकारले जाणार नाहीत, याची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.(PM Kisan Yojana)


क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया वेगवान होणार


या बैठकीदरम्यान दोन्ही आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रुग्णांना सेवा देताना वापरल्या जाणाऱ्या विविध डिजिटल प्रणालींबाबत रुग्णालय प्रतिनिधींना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णांची नोंदणी आणि क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी या डिजिटल यंत्रणेचा मोठा फायदा होणार आहे.रुग्णावर तातडीने उपचार सुरू करण्यासाठी 'प्री-ऑथरायझेशन' मंजुरीसाठी लागणारा वेळ कमी केला जाईल. नियमित डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांना प्रत्येक सायकलच्या वेळी करावी लागणाऱ्या ई-केवायसीच्या सक्तीमधून सूट देण्याबाबत विचार सुरू आहे. अस्थिरोग उपचारांशी संबंधित काही वैद्यकीय पॅकेजेसच्या दरांमध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यावरही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यामुळे या योजनेतील सर्व घटकांनी समन्वय आणि जबाबदारीची भूमिका निभावावी, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.(PM Kisan Yojana)

Comments
Add Comment

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या

BEST Employees Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; सकाळी ११.३० वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार असलेल्या बेस्ट सेवेवर आजपासून संपाचे सावट आले आहे.

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील