नाशिक : सायबर गुन्हेगार (Cyber criminals) नागरिकांना लुटण्यासाठी नवनवीन फंडे शोधत असतात. आता या डिजिटल चोरांनी चोरीचा नवा फंडा शोधला आहे. ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी नवा फंडा अवलंबला आहे. डिजिटल फ्रॉडमधून लुटलेली रक्कम थेट शहरातील नामांकित व्यावसायिक आणि पेट्रोलपंपांच्या बँक खात्यांमध्ये (Petrol pump bank accounts) जमा करून त्या बदल्यात रोख रक्कम उकळण्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे.
- कमी लोकसंख्येच्या ठिकाणी चार तालुक्यांना एकत्र सेवा मुंबई : राज्यातील वाढती वाहनसंख्या आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन परिवहन व्यवस्थेचे ...
डिजिटल चोरांचा नवा फंडा काय ?
सायबर गुन्हेगारांकडून सध्या ‘किराया खाता’ या नव्या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. यामध्ये बँक खातेधारकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती भाड्याने घेतली जातात. त्यानंतर ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये जमा केली जाते आणि ती नंतर रोख स्वरूपात काढली जाते. त्यामुळे संबंधित खातेदार नकळत सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
माहितीनुसार, हॅकरच्या (Hacker) संपर्कात असलेल्या एका संशयिताची ओळख पटली असून, त्याच्याविरोधात मुंबई सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान या संशयिताने शहरातील तीन पेट्रोलपंपांवर सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम रोख स्वरूपात घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Nashik : नाशिक शहरात घडलेल्या एका घटनेनं खळबळ उडाली आहे. एका चार्टर्ड अकाउंटंटचे तब्बल १८ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्याला रात्रभर डांबून ठेवत ...
‘किराया खाता’ म्हणजे नेमकं काय ?
ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम ज्या बँक खात्यावर जमा केली जाते, ते खाते भाडेतत्त्वावर घेतलेले असते. सायबर गुन्हेगारांच्या भाषेत अशा खात्यांना ‘किराया खाता’ म्हटले जाते. सध्या सायबर फसवणुकीत या खात्यांचा वापर झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Ashok Kharat : नाशिकमधील अशोक खरात हा राज्यात काय तर देशात चर्चेत आहे. अशोक खरात सध्या कोठडीत असून त्याची चौकशी सुरु आहे. पण अशोक खरातही बाहेरही होता असं ...
सायबर पोलिसांचे आवाहन
दरम्यान, सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. आपली बँक खाती, एटीएम कार्ड (ATM card), इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआय सुविधा इतरांच्या वापरासाठी देऊ नयेत. तसेच कोणताही संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तात्काळ माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.