Nashik : डिजिटल चोरांचा नवा फंडा ! चोरीची रक्कम थेट पेट्रोलपंपांच्या खात्यात; नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार उघड

नाशिक : सायबर गुन्हेगार (Cyber criminals) नागरिकांना लुटण्यासाठी नवनवीन फंडे शोधत असतात. आता या डिजिटल चोरांनी चोरीचा नवा फंडा शोधला आहे. ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी नवा फंडा अवलंबला आहे. डिजिटल फ्रॉडमधून लुटलेली रक्कम थेट शहरातील नामांकित व्यावसायिक आणि पेट्रोलपंपांच्या बँक खात्यांमध्ये (Petrol pump bank accounts) जमा करून त्या बदल्यात रोख रक्कम उकळण्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघडकीस आला आहे.



डिजिटल चोरांचा नवा फंडा काय ?


सायबर गुन्हेगारांकडून सध्या ‘किराया खाता’ या नव्या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. यामध्ये बँक खातेधारकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती भाड्याने घेतली जातात. त्यानंतर ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये जमा केली जाते आणि ती नंतर रोख स्वरूपात काढली जाते. त्यामुळे संबंधित खातेदार नकळत सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.


माहितीनुसार, हॅकरच्या (Hacker) संपर्कात असलेल्या एका संशयिताची ओळख पटली असून, त्याच्याविरोधात मुंबई सायबर पोलीस ठाण्यात (Cyber ​​Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान या संशयिताने शहरातील तीन पेट्रोलपंपांवर सुमारे दीड लाख रुपयांची रक्कम रोख स्वरूपात घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.



‘किराया खाता’ म्हणजे नेमकं काय ?


ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम ज्या बँक खात्यावर जमा केली जाते, ते खाते भाडेतत्त्वावर घेतलेले असते. सायबर गुन्हेगारांच्या भाषेत अशा खात्यांना ‘किराया खाता’ म्हटले जाते. सध्या सायबर फसवणुकीत या खात्यांचा वापर झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.



सायबर पोलिसांचे आवाहन


दरम्यान, सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. आपली बँक खाती, एटीएम कार्ड (ATM card), इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआय सुविधा इतरांच्या वापरासाठी देऊ नयेत. तसेच कोणताही संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तात्काळ माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

Nashik TCS Case Nida Khan : नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयित निदा खानला जामीन

Nashik : नाशिकमधील टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या एका अविवाहित तरुणीवर अत्याचार तसेच जबरदस्तीने धर्मांतराचा

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.