सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जणांना स्थानिकांनी वाचवले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या पिकअप गाडीतील १४ जण सोलापूरच्या रांजणीगावचे स्थानिक होते. मिळालेल्या माहितीनुसार हे १४ जण देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन करून घरी परत येताना ही घटना घडली आहे.
View this post on Instagram
नेमकं घडलं काय ?
हा अपघात माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ झाला. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत हा अपघात झाला.विहिरीला कठडे नव्हते. तसेच ती काठोकाठ पाण्याने भरलेली आहे. याच विहिरीत भाविकांची पिकअप गाडी कोसळली. हा अपघात नेमका कसा घडला, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण भरदिवसा ही अपघाताची घटना घडली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी ही घटना आहे. या घटनेत तब्बल ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हे १४ जण म्हसवडमधील सिद्धनाथच्या दर्शनासाठी पिकअप गाडीने गेले होते. दर्शन करून परत येताना हा अपघात झाला. यात आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने १४ पैकी सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सुदैवाने…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 14, 2026






