Saturday, June 13, 2026

Mumbai-Goa Highway : प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबई-गोवा महामार्गावर मोठा दिलासा! संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील ३ महत्त्वाचे पूल लवकरच सुरू

Mumbai-Goa Highway : प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबई-गोवा महामार्गावर मोठा दिलासा! संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील ३ महत्त्वाचे पूल लवकरच सुरू

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पुलांच्या कामांमुळे वाहतूक कोंडी आणि प्रवासातील अडचणी वाढल्या होत्या. मात्र आता रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील तीन महत्त्वाच्या पुलांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, हे पूल लवकरच वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबई-गोवा मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Mumbai-Goa Highway)

संगमेश्वर पुलावर दोन्ही बाजूंनी वाहतुकीची तयारी :

संगमेश्वर येथील उड्डाणपुलाच्या एका बाजूवरून सध्या वाहनांची ये-जा सुरू आहे. दुसऱ्या बाजूचे काम वेगाने सुरू असून ते ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू झाल्यानंतर पावसाळ्यात या परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. (Mumbai-Goa Highway)

पाली पूल १७ जूनपासून सुरू :

रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून १७ जूनपासून हा पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. या पुलामुळे महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होणार असून रत्नागिरी-गोवा दरम्यानचा प्रवासही अधिक जलद होईल. (Mumbai-Goa Highway)

लांजा उड्डाणपूल जुलैअखेर पूर्ण :

लांजा शहरातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यानंतर स्थानिक आणि महामार्गावरील वाहतूक स्वतंत्रपणे हाताळणे शक्य होणार आहे. (Mumbai-Goa Highway)

चौपदरीकरण प्रकल्पाला मिळणार नवी गती :

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील हे तीन पूल अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. विविध तांत्रिक अडचणींमुळे या कामांना विलंब झाला होता. मात्र आता ही कामे पूर्णत्वास येत असल्याने संपूर्ण प्रकल्पाला गती मिळणार आहे. पुलांच्या उद्घाटनानंतर प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी होण्यास मदत होणार असून कोकणातील वाहतुकीच्या समस्याही मोठ्या प्रमाणात कमी होतील. (Mumbai-Goa Highway)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >