सर्व खासदारांना निमंत्रण; पडद्यामागे हालचालींना वेग मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून, ‘उबाठा’ गटाचे काही खासदार सत्ताधारी शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. ‘उबाठा’ गटाने त्याची धास्ती घेतली असून, पक्षातील संभाव्य गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रविवारी, १४ जून रोजी ‘मातोश्री’ निवासस्थानी सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे.
मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी सध्या चांगलाच जोर धरला आहे. काँग्रेसकडून ...
शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी मुंबई : सिद्धिविनायक मंदिर हे ...
‘उबाठा’ गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मध्यंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट आणि खासदार संजय जाधव यांच्या पत्नीच्या तब्येतीची शिंदे यांनी केलेली विचारपूस, यांमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. त्यातच, धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘उबाठा’ गटाच्या एका महत्त्वाच्या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दांडी मारल्याने संशयाची धार तीव्र झाली आहे. अशा स्थितीत ‘मातोश्री’वर होणाऱ्या बैठकीत नेमके किती खासदार उपस्थित राहतात आणि काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






