Wednesday, June 10, 2026

Uri Blast : ‘उरीमधील भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद; गस्तीदरम्यान नियंत्रण रेषेजवळ घडली दुर्दैवी घटना

Uri Blast : ‘उरीमधील भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद; गस्तीदरम्यान नियंत्रण रेषेजवळ घडली दुर्दैवी घटना

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान हुतात्मा झाल्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणारे हे दोन्ही जवान महाराष्ट्राचे सुपुत्र असल्याने राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. मंगळवारी (९ जून) सायंकाळी उरीतील कमलकोट परिसरात नियमित गस्तीदरम्यान हा दुर्दैवी प्रकार घडला. (Uri Blast)

हुतात्मा झालेल्या जवानांमध्ये नवी मुंबईतील ऐरोली येथील वीर जवान विक्रम चव्हाण आणि सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शाहपूर गावचे वीर जवान अर्जुन जाधव यांचा समावेश आहे. दोघांच्या निधनाची बातमी समोर येताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावागावांत शोककळा पसरली आहे. (Uri Blast)

गस्तीदरम्यान अचानक स्फोट :

लष्करी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेजवळील कमलकोट भागात भारतीय जवान नियमित गस्त घालत होते. त्यावेळी अचानक एक जोरदार स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की विक्रम चव्हाण आणि अर्जुन जाधव हे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात तातडीने सतर्कता वाढवण्यात आली. (Uri Blast)

इतर जवानांनी प्रसंगावधान राखत त्वरित बचावकार्य सुरू केले. गंभीर जखमी अवस्थेतील दोन्ही जवानांना हेलिकॉप्टर आणि विशेष लष्करी वाहनांच्या मदतीने श्रीनगरमधील बदामीबाग येथील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान दोघांचीही प्राणज्योत मालवली. (Uri Blast)

स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट :

हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार भूसुरुंगाचा स्फोट झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, दहशतवादी कारवायांशी याचा काही संबंध आहे का किंवा अन्य कोणते कारण आहे का, याचा सखोल तपास लष्कराकडून सुरू करण्यात आला आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून तज्ज्ञ पथक घटनास्थळी पुरावे गोळा करत आहे. नियंत्रण रेषेवरील सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली आहे. (Uri Blast)

महाराष्ट्रावर शोककळा :

हुतात्मा विक्रम चव्हाण यांच्या ऐरोली येथील निवासस्थानी शोकाकुल वातावरण आहे. देशसेवेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या आपल्या मुलाने कर्तव्य बजावताना बलिदान दिल्याचा अभिमान असला तरी त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, साताऱ्यातील शाहपूर गावातही दुःखाचे वातावरण आहे. अर्जुन जाधव यांच्या निधनाची बातमी समजताच ग्रामस्थांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. गावातील अनेकांनी अर्जुन यांना लहानपणापासून देशसेवेचे स्वप्न पाहणारा धाडसी युवक म्हणून आठवले. (Uri Blast)

लष्करी इतमामात अंत्यसंस्कार :

दोन्ही हुतात्मा जवानांचे पार्थिव आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात येणार आहे. त्यानंतर संपूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. हजारो नागरिक, माजी सैनिक आणि स्थानिक प्रशासन या वीरपुत्रांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. (Uri Blast)

देशभरातून श्रद्धांजली :

या घटनेनंतर राजकीय नेते, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. सोशल मीडियावरही विक्रम चव्हाण आणि अर्जुन जाधव यांच्या शौर्याला सलाम करत अनेकांनी भावपूर्ण संदेश पोस्ट केले आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या या दोन वीर जवानांच्या बलिदानामुळे पुन्हा एकदा भारतीय सैनिकांचे समर्पण आणि शौर्य अधोरेखित झाले आहे. त्यांच्या या सर्वोच्च बलिदानाचे राष्ट्र कायम ऋणी राहील. (Uri Blast)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >