Nashik : नाशिकमध्ये लाचखोरीवर एसीबीचा मोठा प्रहार ! १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी रंगेहात जेरबंद

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील सटाणा (Satana) तालुक्यात लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, सातबारा उताऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे आणि वारस नोंदीत नाव दुरुस्त करून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, शासकीय कार्यालयांमधील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



महिला तलाठी कोण ?


लाच स्वीकारताना पकडण्यात आलेल्या महिला ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव मनिषा नारायण बावीस्कर (Manisha Narayan Baviskar) (वय ३६) असे असून, त्या सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव (Brahmangaon) येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदाराची ब्राह्मणगाव येथील गट क्रमांक ८२४ मध्ये शेती जमीन आहे. या जमिनीवर भाऊसाहेब हिरे विविध कार्यकारी सेवा संस्था सोसायटीचे सुमारे चार लाख रुपयांचे कर्ज दाखविण्यात आले होते. कर्जमाफी झाल्यानंतरही हा बोजा सातबारा उताऱ्यावरून कमी करण्यात आलेला नव्हता.


याशिवाय, वारस नोंदीदरम्यान तक्रारदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने नमूद झाले होते. त्यामुळे कागदपत्रांनुसार नाव दुरुस्त करून मिळावे यासाठी संबंधितांनी अर्ज केला होता. तक्रारीनुसार, ही दोन्ही कामे करून देण्यासाठी तलाठी मनिषा बावीस्कर यांनी स्वतःसह मंडळ अधिकाऱ्यांसाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने अखेर नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.



तहसील कार्यालयात जाळे


तक्रारीनंतर २७ एप्रिल २०२६ रोजी तक्रारदार आणि पंचांनी सटाण्यातील मराठा हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या जनगणना प्रशिक्षणादरम्यान तलाठी मनिषा बावीस्कर यांची भेट घेतली. यानंतर सटाणा तहसीलदार कार्यालयातही चर्चा झाली. त्यावेळी संबंधित तलाठीने १० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दिल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले. दरम्यान, मंडळ अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्यासाठीही एसीबीने पडताळणी केली. मात्र, त्यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली नसल्याचे समोर आले.



१० हजारांची लाच घेताना एसीबीचा सापळा यशस्वी


यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सटाणा तहसीलदार कार्यालयात सापळा रचला. पंचांसमक्ष तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी मनिषा बावीस्कर यांना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेनंतर सटाणा पोलीस ठाण्यात ( Satana Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.



वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई


ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Anti-Corruption Bureau)पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तर पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार यांनी सापळा अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. कारवाई पथकात पोलीस हवालदार शरद हेंबाडे, युवराज खांडवी आणि विनोद पवार यांचा समावेश होता.



लाचेची मागणी होत असेल तर तक्रार करा


दरम्यान, शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी कोणी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी १०६४ हा टोल फ्री क्रमांक, तसेच ९९३०९९७७०० आणि ९५४५०३१०६४ या व्हॉट्सॲप क्रमांकांवर तक्रार नोंदवता येणार आहे.

Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८