Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शनी चौक परिसरातील गुजर गल्लीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांना आग लावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, एक दिवस आधीच दोन आलिशान कार जाळण्यात आल्या होत्या आणि आता त्याच कुटुंबाच्या दुचाकीला आग लावण्याचा प्रयत्न झाल्याने हा प्रकार अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ( Ahilyanagar Crime News )



आधी कार आता दुचाकी जळून खाक


मिळालेल्या माहितीनुसार, गौरव विनायक कुलकर्णी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन आलिशान चारचाकी वाहनांना गुरुवारी मध्यरात्री आग लावण्यात आली होती. काही क्षणांतच दोन्ही वाहने जळून खाक झाली आणि परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा त्यांच्या दुचाकीला आग लावण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे.( Ahilyanagar Crime News )



कोणी टार्गेट करतंय ?


सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे कुलकर्णी कुटुंबीयांसह संपूर्ण गुजर गल्ली परिसरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. “नेमकं कोण आणि का टार्गेट करतंय?” असा प्रश्न स्थानिक नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाचा धागा आता सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमधून समोर आला आहे. घटनास्थळाजवळील कॅमेऱ्यांमध्ये तीन संशयित व्यक्ती वाहनाजवळ फिरताना स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार नियोजनबद्ध असल्याची शक्यता अधिक बळावली आहे.



घटनेची गंभीर दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून सीसीटीव्हीत दिसणाऱ्या संशयितांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मात्र सलग दोन दिवस एकाच कुटुंबाच्या वाहनांना लक्ष्य केल्याने अहिल्यानगरमध्ये भीतीसोबतच अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.

Comments
Add Comment

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय

Akola ZP : अकोला शिक्षक बदली प्रकरणात मोठी कारवाई; 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली

अकोला : अकोला (Akola) जिल्हा परिषद शिक्षण विभागातील आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.