Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. परिवहन विभागाने चालकांना मराठी शिकण्यासाठी दिलेली मुदत 15 ऑगस्ट रोजी संपणार असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे 18 ऑगस्टपासून मराठी भाषेचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांवर विशेष पथकांमार्फत कारवाई होण्याची शक्यता आहे. (Maharashtra News)


परिवहन विभागाच्या माहितीनुसार, या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 18 हजार रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण वर्ग सुरू असून चालकांना दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेले सोपे मराठी शिकवले जात आहे. (Mumbai News)


सुरुवातीला तयार करण्यात आलेला 200 पानांचा अभ्यासक्रम बदलून आता केवळ दोन पानांचा सोपा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यात प्रवाशांशी होणाऱ्या दैनंदिन संवादासाठी उपयुक्त शब्द आणि वाक्यांचा समावेश करण्यात आला आहे. (Taxi Drivers)



या प्रशिक्षणासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. चालकांची तोंडी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या चालकांना परिवहन विभागाकडून अधिकृत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. (Marathi Bhasha)


या प्रशिक्षण मोहिमेचा समारोप 17 ऑगस्ट रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणार आहे. त्यानंतर 18 ऑगस्टपासून विशेष पथके रस्त्यावर उतरून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Autoo Drivers)



परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी 1 मेपासून हा नियम लागू करण्याची घोषणा केली होती. मात्र, रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी या निर्णयाला विरोध केल्यानंतर चालकांना मराठी शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. आता ही मुदत संपत असल्याने पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Marathi Training)


Comments
Add Comment

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी

Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय