Jalna : पोलीस भरती होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं, सराव जीवावर बेतला

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. लहानपणापासून एकचं स्वप्न होत ते म्हणजे पोलीस भरती. त्यासाठी दिवस रात्र मेहनत करणं हेच कधी जीवावर बेतू शकतं अशी कल्पना पण नाही करू शकत. आपण जे विचार पण नाही करू शकत ते प्रत्येक्ष जेव्हा आपल्या समोर घडतं तेव्हा आपल्या पायाखालची जमिन सरकते . अशीच एक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे . प्रीती काशीराम भाकड ( वय वर्ष १९ ) नेहमी प्रमाणे सरावासाठी ती घरातून बाहेर पडली पण हा दिवस तिच्या साठी शेवटचा असेल असे तिने कधी स्वप्नात पण पाहिलं नसेल .



नेमकं काय झालं असेल ? 


पोलीस भरतीसाठी ती नेहमी प्रमाणे शहरापासून काही अंतरावर असलेल्या वळवंडा शिवारातील एका पाण्याने भरलेल्या खदानीच्या परिसरात गेली होती.नेहमी प्रमाणे सराव सुरू झाला.संचालक आणि प्रशिक्षक ह्यांच्या उपस्थितीमध्ये हा सराव सुरू होता. सराव सुरू असताना अचानक प्रीती चा पाय सरकला आणि ती खदानीच्या खोल पाण्यात पडली . प्रीती पाण्यात पडताच लगेच आरडाओरडा झाला काहींनी पाण्यात उतरून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु खोल पाण्यात गेल्यामुळे श्वास गुदमरून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत खदानीचे संचालक आणि प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



माहिती पोलिसांना मिळताच अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने वळवंडा शिवारातील घटनास्थळी धाव घेतली . वळवंडा शिवारातील ग्रामस्थांच्या मदतीने प्रीतीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.मृतदेह तात्काळ शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्रीतीच्या मृत्यूची बातमी समजताच तिच्या कुटुंबियां मोठा धक्का बसला.संपूर्ण अंबड शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Jaykumar Gore : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून २८ जून पासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून २

Shevgaon News : कोट्यवधी खर्चूनही १० वर्षांपासून रखडला शेवगावचा सांडपाणी प्रकल्प; गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी

शेवगाव : नगरपरिषदेमार्फत सुमारे दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर कोट्यवधी

Agriculture News : ज्वारी खरेदीस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

जळगाव : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून किमान आधारभूत किमतीअंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत ३१

Weather Update : हवामान विभागाचा 'हाय अलर्ट': पुढचे १० तास देशासाठी धोक्याचे! जाणून घ्या महाराष्ट्राचा अंदाज काय ?

देशातील हवामानात अचानक मोठे बदल पाहायला मिळत असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) अत्यंत धोक्याचा इशारा दिला आहे.

Sangali Tadkadtai : महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनोखा वारसा; कोकणचा ‘संकासूर’ आणि सांगलीची ‘तडकडताई’

महाराष्ट्र: महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले राज्य आहे. येथे केवळ सण-उत्सव साजरे केले जात नाहीत, तर शतकानुशतके चालत

Pune News : मदरसा क्लासच्या बहाण्याने घरी थांबवलं आणि १४ वर्षाच्या मुलीला नको नको तिथे... पुण्यातील कात्रज हादरले!

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराची संतापजनक घटना ताजी असतानाच, आता