Ulhasnagar Double Murder Case : उल्हासनगर दुहेरी हत्याकांडात मोठा ट्विस्ट! तक्रारदारच मुख्य आरोपी; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा...

Ulhasnagar : उल्हासनगरातील गाजलेल्या कैलास कॉलनी दुहेरी हत्याकांड प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. सुरुवातीला गोळीबाराची तक्रार करणारा दीपक ठाकूर आता स्वतःच आरोपी ठरला आहे. पोलिसांकडून त्याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराच्या काही मिनिटांपूर्वीच मुख्य आरोपी अजय राव याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करीत सत्य उघडकीस आणले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, 21 मे रोजी रात्री अजय राव आणि त्याचा मित्र अभय विश्वकर्मा हे दोघे बाइक वरुन जाताना कैलास कॉलनी परिसरात काही जणांनी त्यांना अडवले आणि दोघांना खाली खेचून मारहाण करण्यात आली होती. यावेळी दीपक ठाकूर आणि त्याच्या साथीदारांनी अजय राववर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचा आरोप केला होता. तसेच त्याच्या मोटारसायकलीचीही तोडफोड करण्यात आली होती.


पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून सुरू झालेली मारहाण आणि त्यानंतर झालेला गोळीबार या दोन्ही घटना परस्परांशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे आता पोलिस दोन्ही घटनांचा सोबत तपास करत आहेत. या दुहेरी हत्याकांडामागील संपूर्ण कट आणि संबंधित आरोपींची भूमिका उघड करण्यावर भर देण्यात येत आहे. या नव्या खुलाशामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. सुरुवातीला मात्र पीडित म्हणून समोर आलेल्या व्यक्तीवरच आता गंभीर आरोप झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या उल्हासनगरमध्ये होत आहे.

Comments
Add Comment

Bombay High Court : नितीन गडकरींशी संबंधित बदनामीकारक मजकूर त्वरित हटवा!

मुंबई उच्च न्यायालय; डीपफेक व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना निर्देश मुंबई :

Nashik : नाशिक महापालिकेने ११,६०९ खड्डे बुजवले, रस्ते दुरुस्तीची मोहीम युद्धपातळीवर

Nashik : मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या वाढली असतानाही नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation)

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या ४ मंत्र्यांना शेवटचा अल्टीमेटम

- कामगिरीत सुधारणा झाली नाही तर नारळ देणार; पक्षवाढ आणि जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने उपमुख्यमंत्री

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra : अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्यात बिनसलं? १८ महिन्यांपासून राहतात वेगळे; ११ वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेणार ?

मुंबई : ग्लॅमर आणि झगमगाटाने वेढलेल्या सिनेसृष्टीतील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य खरोखरच तितके सुखी आणि चमकदार

Mumbai Doctors Strike : मुंबईत निवासी डॉक्टरांचा संप; ओपीडी बंद, रुग्णांचे हाल सुरू

मुंबई : मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपामुळे हजारो रुग्णांना मोठा मनस्ताप सहन

Nashik : नाशिकचे ‘उधमाळ’ ठरणार पहिले आंतरराष्ट्रीय ‘डार्क स्काय समुदाय' गाव

Nashik : पर्यटनाने समृद्ध असलेले , हिरवाईने नटलेले आणि अध्यात्मिक घटनांचा वारसा लाभलेल्या नाशिकला आता आणखी नवी ओळख