Ashadhi Ekadashi Wari : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; ७ जुलैला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान

पुणे : आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू (Dehu) यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक (Timetable) जाहीर केले आहे. ज्येष्ठ वद्य सप्तमी, ७ जुलै रोजी मुख्य देऊळवाड्यातून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यानिमित्ताने देहूनगरीत तयारीला वेग आला असून वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे.


प्रस्थानाच्या दिवशी म्हणजे ७ जुलै रोजी पालखीचा विसावा इनामदार वाड्यात असेल. त्यानंतर ८ जुलै रोजी पालखी इनामदार वाड्यातून मार्गस्थ होईल. यावेळी मानाची पहिली आरती सूफी संत अनगडशा बाबा यांच्या दर्ग्यात पार पडणार असून त्यानंतर पालखी पंढरपूरच्या (Pandharpur)दिशेने पुढील प्रवास सुरू करेल.



संस्थानाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी ह.भ.प. विक्रमसिंह उमराज मोरे, ह.भ.प. उमेश सुरेश मोरे आणि ह.भ.प. लक्ष्मण दत्तात्रय मोरे यांची प्रमुख विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच पालखीच्या रथासाठी नवीन व्यवस्था करण्यात येत असून रथ ओढण्यासाठी तीन नवीन बैलजोड्या खरेदी करून त्यांना रथास जोडण्यात येणार आहे.


संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक


७ जुलै: मंगळवार- पालखी प्रस्थान सोहळा (देहू)
८ जुलै: बुधवार- इनामदार साहेब वाडा
९ जुलै: गुरुवार- आकुर्डी (श्री विठ्ठल मंदिर)
१० जुलै: शुक्रवार- श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर
११ जुलै: शनिवार- श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नानापेठ (पुणे)
१२ जुलै: रविवार- लोणी काळभोर, कदम वाक वस्ती (नवीन पालखी तळ)
१३ जुलै: सोमवार- यवत (भैरवनाथ मंदिर)
१४ जुलै: मंगळवार- वरवंड (विठ्ठल मंदिर)
१५ जुलै: बुधवार- उंडवडी गवळ्याची
१६ जुलै: गुरुवार- बारामती, शारदा विद्यालय प्रांगण
१७ जुलै: शुक्रवार- सणसर (पालखी तळ)
१८ जुलै: शनिवार- निमगाव केतकी (पालखी तळ)
१९ जुलै: रविवार- इंदापूर (पालखी तळ)
२० जुलै: सोमवार- सराटी पालखी तळ (निरा स्नान)
२१ जुलै: मंगळवार- आकलूज
२२ जुलै: बुधवार- बोरगाव श्रीपूर
२३ जुलै: गुरुवार- पिराची कुरोली
२४ जुलै: शुक्रवार- वाखरी
२५ ते २८ जुलै: - पंढरपूर मुक्काम व आषाढी एकादशी सोहळा
२९ जुलै: बुधवार- पालखीचा देहूकडे परतीचा प्रवास



महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या वारीला शेकडो वर्षांचा इतिहास लाभला आहे. आषाढी एकादशीच्या (Ashadi Ekadashi) निमित्ताने देहू, आळंदीसह राज्यातील विविध भागांतून पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होतात. विठ्ठल भक्ती, समता, बंधुभाव आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात दरवर्षी लाखो वारकरी सहभागी होतात. त्यामुळे यंदाच्या वारीकडेही राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)

Vishawas Nangare Patil : नागपूरच्या पोलीस दलात मोठे बदल; विश्वास नांगरे पाटील नवे CP

नागपूर : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी

Kolhapur Shaken : माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्या; परिसरात शोककळा

कोल्हापूर: कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ, सोन्या मारुती चौक परिसरात एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा