School Reopening : राज्यातील शाळांबाबत शिक्षण विभागाचा निर्णय; १५ जूनला वाजणार शाळेची घंटा!

मुंबई : राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा रंगत होत्या. शाळा (School) उशीरा सुरू होणार किंवा नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाईन (Online) पद्धतीने होणार, अशा अफवा सोशल मीडियावर (Social Media) पसरत होत्या. मात्र, शिक्षण विभागाने यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


१५ जूनलाच शाळा सुरू होणार


शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून रोजी नियोजित वेळेनुसार सुरू होणार आहे. शाळा उशीरा सुरू होणार किंवा ऑनलाईन (Online) पद्धतीने शिक्षण दिले जाणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यंदाही शैक्षणिक वर्षाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन (Offline) शिक्षणातूनच होणार आहे. राज्य मंडळाच्या शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शाळा सुरू करण्याच्या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.



विदर्भातील शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल


प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी पूर्वीचे शैक्षणिक वेळापत्रक कायम राहणार आहे. तसेच इतर मंडळांच्या शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन विदर्भातील शाळा १५ जून ते २९ जून या कालावधीत सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत चालविण्यात येणार आहेत. त्यानंतर ३० जूनपासून विदर्भासह राज्यातील सर्व शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील.

Comments
Add Comment

Farmer loan waive : कर्जमाफी अन् अनुदानातील अडथळे दूर होणार; संबंधित विभागांना तातडीने बैठकांचे आदेश

मुंबई : राज्यातील शेतकरी कर्जमाफी (Farmer loan waive), प्रोत्साहन अनुदान आणि ओटीएस (वन टाईम सेटलमेंट) योजनांच्या

Raigad Fort : दरड कोसळल्याने रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग २५ जूनपर्यंत बंद

रायगड : अतिवृष्टीमुळे किल्ले रायगडावरील (Raigad Fort) महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने किल्ल्यावर जाणारा पायरी मार्ग

Maharashtra wedding card new rule : लग्न ठरलंय? मग हा नवा नियम जाणून घ्या; पत्रिकेत द्यावी लागणार 'ही' महत्त्वाची माहिती

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage)

Vishawas Nangare Patil : नागपूरच्या पोलीस दलात मोठे बदल; विश्वास नांगरे पाटील नवे CP

नागपूर : महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलात महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली असून वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी

Kolhapur Shaken : माजी महापौरांच्या १७ वर्षीय नातवाची आत्महत्या; परिसरात शोककळा

कोल्हापूर: कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ, सोन्या मारुती चौक परिसरात एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या