School Reopening : राज्यातील शाळांबाबत शिक्षण विभागाचा निर्णय; १५ जूनला वाजणार शाळेची घंटा!

मुंबई : राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा रंगत होत्या. शाळा (School) उशीरा सुरू होणार किंवा नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाईन (Online) पद्धतीने होणार, अशा अफवा सोशल मीडियावर (Social Media) पसरत होत्या. मात्र, शिक्षण विभागाने यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


१५ जूनलाच शाळा सुरू होणार


शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून रोजी नियोजित वेळेनुसार सुरू होणार आहे. शाळा उशीरा सुरू होणार किंवा ऑनलाईन (Online) पद्धतीने शिक्षण दिले जाणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यंदाही शैक्षणिक वर्षाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने ऑफलाईन (Offline) शिक्षणातूनच होणार आहे. राज्य मंडळाच्या शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. शाळा सुरू करण्याच्या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.



विदर्भातील शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल


प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी पूर्वीचे शैक्षणिक वेळापत्रक कायम राहणार आहे. तसेच इतर मंडळांच्या शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, उष्णतेची तीव्रता लक्षात घेऊन विदर्भातील शाळा १५ जून ते २९ जून या कालावधीत सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत चालविण्यात येणार आहेत. त्यानंतर ३० जूनपासून विदर्भासह राज्यातील सर्व शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील.

Comments
Add Comment

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणायला तयार!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; त्यांनी रामरक्षेची किमान दोन पाने तरी स्वतः वाचावीत मुंबई : "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)