Maharashtra Karjmafi 2026 : ४ ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे ७ हजार कोटी जमा होणार

मुंबई : राज्य सरकारच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत पात्र ठरलेल्या सुमारे १६ लाख ९४ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी एकाच वेळी सात हजार कोटी रुपये जमा केले जाणार आहेत. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे थकीत कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा पुन्हा नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.



राज्य सरकारने ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेनुसार पहिल्या टप्प्यात दोन लाखांच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांची यादी प्राप्तिकर विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आली होती. यामध्ये प्राप्तिकर भरणारे ९४ हजार शेतकरी आढळून आल्याने त्यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तर उर्वरित १६ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच रक्कम वर्ग करण्यात येत आहे.


या योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन निधी देण्यात येत आहे. तसेच दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी दोन लाखांवरील उर्वरित रक्कम बँकेत भरल्यानंतर, 'एकवेळ समझोता' (वन टाईम सेटलमेंट) योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यातही सरकार २ लाख रुपये जमा करणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पात्र शेतकऱ्यांनी काळजी करू नये असे सांगत, या प्रक्रियेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Suicide News : खवड्या डोंगर दुर्घटनेला कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी? आईच्या जुन्या व्हिडिओंमुळे नवे प्रश्न उपस्थित

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर २१ ऑगस्ट २०२६ रोजी घडलेल्या

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन