Accident News : लग्नाला निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Accident News : उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ महामार्गावर फतेहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक बसून हा अपघात झाला. लग्नाला निघालेल्या कुटुंबावर अशा प्रकारे काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



नेमकं काय घडलं ?


बिहारमधून (Bihar) एक कुटुंब राजस्थानच्या (Rajasthan० चुरू जिल्ह्यात एका लग्न सोहळ्यासाठी जात होते. प्रवासादरम्यान आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर त्यांच्या कारचा अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चालकाला डुलकी लागल्याने कारवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार समोरून जाणाऱ्या कंटेनरला मागून जाऊन धडकली. (Accident News)



वाहनाचा अर्धा भाग कंटेनरमध्ये घुसला


ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. वाहनाचा अर्धा भाग थेट कंटेनरमध्ये घुसला होता. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी आरडाओरड केली यावेळेस आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली. बचावकार्य केले. या अपघातात कारमधील शंकर कुमार आणि त्यांचा भाऊ सुनील कुमार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तर अपघातात चालक मोहम्मद शोएब उर्फ सोहैब, परमिता कुमारी, पूजा कुमारी, राजीव कुमार उर्फ राजू आणि अयांश हे गंभीर जखमी झाले आहेत.


घटनेची माहिती मिळताच पोलीस, यूपीडीए आणि रुग्णवाहिका पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना फतेहाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघाताचा अधिक तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित