Accident News : लग्नाला निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Accident News : उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनौ महामार्गावर फतेहाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक बसून हा अपघात झाला. लग्नाला निघालेल्या कुटुंबावर अशा प्रकारे काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



नेमकं काय घडलं ?


बिहारमधून (Bihar) एक कुटुंब राजस्थानच्या (Rajasthan० चुरू जिल्ह्यात एका लग्न सोहळ्यासाठी जात होते. प्रवासादरम्यान आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर त्यांच्या कारचा अपघात झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चालकाला डुलकी लागल्याने कारवरील त्याचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार समोरून जाणाऱ्या कंटेनरला मागून जाऊन धडकली. (Accident News)



वाहनाचा अर्धा भाग कंटेनरमध्ये घुसला


ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. वाहनाचा अर्धा भाग थेट कंटेनरमध्ये घुसला होता. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी आरडाओरड केली यावेळेस आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेतली. बचावकार्य केले. या अपघातात कारमधील शंकर कुमार आणि त्यांचा भाऊ सुनील कुमार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एका महिलेचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तर अपघातात चालक मोहम्मद शोएब उर्फ सोहैब, परमिता कुमारी, पूजा कुमारी, राजीव कुमार उर्फ राजू आणि अयांश हे गंभीर जखमी झाले आहेत.


घटनेची माहिती मिळताच पोलीस, यूपीडीए आणि रुग्णवाहिका पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना फतेहाबाद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघाताचा अधिक तपास सुरु आहे.

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या