India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः आसाम आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 95 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील 17 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, तसेच ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.



हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि इतर काही राज्यांमध्ये नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याचा धोका असून सखल भागांमध्ये पाणी साचण्याची आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये 6 आणि 8 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागांतही पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ आणि कर्नाटकमध्येही पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.


दिल्ली-एनसीआरमध्येही पावसाची संततधार सुरूच आहे. बुधवारी सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने 5 ते 8 ऑगस्टदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, सध्या दिल्लीसाठी कोणताही विशेष सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलेला नाही.


उत्तराखंड, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणा, चंदीगड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि माहे येथेही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, ओडिशा, झारखंड, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.


उत्तर प्रदेशातही पावसाचा प्रभाव कायम आहे. राज्यातील 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर पश्चिम उत्तर प्रदेशातील 20 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.


Comments
Add Comment

Bihar Road Accident : कीर्तन सुरुच होतं... तेवढ्यात भयान घडलं! भरधाव कारने भाविकांना चिरडले; एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

बिहार : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील NH-327E महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. बजरंगबली मंदिराजवळ

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”: