Karnataka Crime News: २५ एकर जमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या; खिल्लार बैलांसाठी प्रसिद्ध निराळे कुटुंबावर काळाचा घाला

विजापूर : जमिनीच्या वादातून नातेसंबंध रक्तरंजित झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील (Karnataka) विजापूर (Vijapur) जिल्ह्यात घडली आहे. शेतजमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर खिल्लार बैलांचे संगोपन करणारे आणि ‘निराळे सावकार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या निराळे कुटुंबातील सदस्य या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात ही घटना घडली. गावातील निराळे आणि गोळगी कुटुंबांमध्ये २५ एकर शेतीच्या मालकीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. संबंधित जमीन निराळे कुटुंबीयांनी खरेदी केली होती. मात्र, गोळगी कुटुंबातील एका नातेवाईकाने या व्यवहाराला विरोध दर्शवला होता. याच कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा वाद झाले होते. तरीही निराळे कुटुंबाने जमीन खरेदीचा निर्णय कायम ठेवला होता.



शेतात साफसफाईसाठी गेले आणि झाला हल्ला


मयत रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे आणि शब्बीर अत्तार हे शेतात साफसफाईच्या कामासाठी गेले होते. त्याचवेळी गोळगी कुटुंबातील काही सदस्य घटनास्थळी पोहोचले. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर वाद उफाळून आला आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. आरोपींनी प्रथम गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर धारदार शस्त्रांनी हल्ला करत सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


शेताच्या रस्त्यावर काही फुटांच्या अंतरावर सहा मृतदेह (Dead Bodies)


या हल्ल्यात चडचण नगरपंचायतीचे सदस्य चेतन निराळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू (Death) झाला आहे. मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर नदाफ अत्तार आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शेताच्या रस्त्यावर अवघ्या काही फुटांच्या अंतरावर सहा मृतदेह आढळून आले. मृतांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी गंभीर वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.



पोलिसांची धाव, तपासाला वेग


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अप्पुगौडा आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अप्पुगौडा हा भीमा खोऱ्यातील जुन्या खून प्रकरणातील मृत मानकप्पा मास्टरचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात शेतात कामासाठी आलेले मजूर शब्बीर नदाफ यांचाही मृत्यू झाला. विजापूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून चडचण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



खिल्लार बैलांसाठी प्रसिद्ध ‘निराळे सावकार’ कुटुंब


निराळे कुटुंब हे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांमध्ये विशेष ओळख असलेले नाव आहे. खिल्लार जातीच्या बैलांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी हे कुटुंब प्रसिद्ध आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या गोठ्यात खिल्लार बैल असावा, अशी इच्छा असते आणि त्यामुळे निराळे कुटुंबाची मोठी प्रतिष्ठा निर्माण झाली होती. चडचण येथील प्रसिद्ध यात्रा सुरू करण्यामागेही निराळे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने शेतकरी खिल्लार बैल खरेदी करण्यासाठी येत असत. निराळे कुटुंबाची चौथी पिढी आजही या परंपरेचे जतन करत होती. मात्र, जमिनीच्या वादातून झालेल्या या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Coastal Road Mumbai : कोस्टल रोड परिसर हिरवागार होणार! मान्सूनपूर्वी १५ हजार वृक्षांची लागवड, ६० हजार झाडांचे लक्ष्य

मुंबई : मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पाच्या परिसरात लवकरच मोठ्या प्रमाणावर हरित विकास

Shirdi Sai Baba : साईबाबांना १ कोटींचा सुवर्ण मुकूट अर्पण; लखनौमधील साईभक्ताच्या भक्तीची शिर्डीसह देशभरात चर्चा

शिर्डी : शिर्डीच्या (Shirdi) साईदरबारात श्रद्धा, भक्ती आणि दानशूरतेचं आणखी एक अनोखं उदाहरण समोर आलं आहे. सोन्याच्या

GT vs RR : एका कॅचने फिरवला सामना; राजस्थानच्या हातून निसटली IPL फायनलची संधी!

मुंबई : आयपीएल २०२६ च्या (IPL 2026) दुसऱ्या क्वालिफायरमध्ये (Qualifier) गुजरात टायटन्सने (GT) राजस्थान रॉयल्सचा (RR) ७ विकेट्स

Mumbai local : प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवार ३१ मे रोजी रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वे रविवार ३१ मे २०२६ रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे

छगन भुजबळ आणि माझ्यात वाद नाहीत - सुनील तटकरे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील

‘मान्सून’चे आगमन लांबले?

मुंबई : ‘आज येईल, उद्या येईल’, म्हणून संपूर्ण देश ज्याची चातकासारखी वाट पाहत आहे, तो नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात