Karnataka Crime News: २५ एकर जमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या; खिल्लार बैलांसाठी प्रसिद्ध निराळे कुटुंबावर काळाचा घाला

विजापूर : जमिनीच्या वादातून नातेसंबंध रक्तरंजित झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील (Karnataka) विजापूर (Vijapur) जिल्ह्यात घडली आहे. शेतजमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर खिल्लार बैलांचे संगोपन करणारे आणि ‘निराळे सावकार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या निराळे कुटुंबातील सदस्य या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात ही घटना घडली. गावातील निराळे आणि गोळगी कुटुंबांमध्ये २५ एकर शेतीच्या मालकीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. संबंधित जमीन निराळे कुटुंबीयांनी खरेदी केली होती. मात्र, गोळगी कुटुंबातील एका नातेवाईकाने या व्यवहाराला विरोध दर्शवला होता. याच कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा वाद झाले होते. तरीही निराळे कुटुंबाने जमीन खरेदीचा निर्णय कायम ठेवला होता.



शेतात साफसफाईसाठी गेले आणि झाला हल्ला


मयत रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे आणि शब्बीर अत्तार हे शेतात साफसफाईच्या कामासाठी गेले होते. त्याचवेळी गोळगी कुटुंबातील काही सदस्य घटनास्थळी पोहोचले. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर वाद उफाळून आला आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. आरोपींनी प्रथम गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर धारदार शस्त्रांनी हल्ला करत सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


शेताच्या रस्त्यावर काही फुटांच्या अंतरावर सहा मृतदेह (Dead Bodies)


या हल्ल्यात चडचण नगरपंचायतीचे सदस्य चेतन निराळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू (Death) झाला आहे. मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर नदाफ अत्तार आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शेताच्या रस्त्यावर अवघ्या काही फुटांच्या अंतरावर सहा मृतदेह आढळून आले. मृतांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी गंभीर वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.



पोलिसांची धाव, तपासाला वेग


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अप्पुगौडा आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अप्पुगौडा हा भीमा खोऱ्यातील जुन्या खून प्रकरणातील मृत मानकप्पा मास्टरचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात शेतात कामासाठी आलेले मजूर शब्बीर नदाफ यांचाही मृत्यू झाला. विजापूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून चडचण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



खिल्लार बैलांसाठी प्रसिद्ध ‘निराळे सावकार’ कुटुंब


निराळे कुटुंब हे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांमध्ये विशेष ओळख असलेले नाव आहे. खिल्लार जातीच्या बैलांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी हे कुटुंब प्रसिद्ध आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या गोठ्यात खिल्लार बैल असावा, अशी इच्छा असते आणि त्यामुळे निराळे कुटुंबाची मोठी प्रतिष्ठा निर्माण झाली होती. चडचण येथील प्रसिद्ध यात्रा सुरू करण्यामागेही निराळे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने शेतकरी खिल्लार बैल खरेदी करण्यासाठी येत असत. निराळे कुटुंबाची चौथी पिढी आजही या परंपरेचे जतन करत होती. मात्र, जमिनीच्या वादातून झालेल्या या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Free School Bag : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; राज्य सरकारकडून १७४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या

Western Railway Food and Water Safety : पश्चिम रेल्वेची अन्न आणि पाणी सुरक्षेसाठी कडक तपासणी; 98 टक्के अन्न नमुने, तर 99.87 टक्के पाणी नमुने सुरक्षित

मुंबई : प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने

Free Online Coaching for Competitive Exams : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून आढावा

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या देशभरातील तरुणांना मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देण्याच्या

Mumbai Port Global Partnership : मुंबईच्या सागरी विकासाला वेग; क्रूझ पर्यटनापासून जहाजबांधणीपर्यंत जागतिक गुंतवणुकीच्या संधी

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने (MbPA) व्यापार, पर्यटन आणि बंदराधारित विकासाला नवी दिशा देत क्रूझ पर्यटन, मरिना

BMC : लालबागमधील मानाचे गणपती परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवली; तब्बल ६ अनधिकृत दुकानांसह ४३ फेरीवाल्यांवर कारवाई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून कारवाई Mumbai : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी सुलभ

Ritu Tawde : तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही; महापौरांनी विरोधकांना भरला दम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांकडून अपशब्द वापरत गैरवर्तन केल्यानंतर महापौरांचा