Mumbai local : प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवार ३१ मे रोजी रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वे रविवार ३१ मे २०२६ रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाणून घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे रविवारी रेल्वेमार्गे कुठेही फिरायला जाणार असाल तर आधी वेळापत्रक बघून नियोजन करणे हिताचे आहे. यंदाच्या रविवारी म्हणजेच ३१ मे रोजी मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक आहे.

पश्चिम रेल्वे मरिन लाईन्स स्टेशन येथे ३० आणि ३१ मे च्या मध्यरात्री नाईट ब्लॉक घेणार आहे. यामुळे मरिन लाईन्स स्टेशनवरील सर्व रेल्वे मार्गांवर पहाटे १:१५ ते ४:१५ दरम्यान ब्लॉकचा परिणाम दिसेल. विरारहून चर्चगेटला जाणारी शेवटची गाडी VR91012 असेल, जी विरारहून रात्री ११:३० वाजता सुटेल आणि चर्चगेटला पहाटे १:१० वाजता पोहोचेल. चर्चगेटहून सुटणारी पहिली नियोजित जलद गाडी VR90021 असेल, जी पहाटे ४:४० वाजता सुटेल. चर्चगेटहून सुटणारी पहिली नियोजित धीम्या गतीची गाडी BO90025 असेल, जी पहाटे ४:४६ वाजता सुटेल. नाईट ब्लॉक असल्यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवार ३१ मे रोजी दिवसा रेल्वे वाहतूक खंडित केली जाणार नाही.



 

मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवार ३१ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तसेच कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत मुख्य मार्गावरील विविध सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे. मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ पासून दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत सीएसएमटी मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा CSMT आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

मेगाब्लॉकच्या कालावधीत मुख्य मार्गावरील विविध सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे. मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ पासून दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत सीएसएमटी मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा CSMT आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.



हार्बरवर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ पर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी – पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर २ ते ५ जून दरम्यान विशेष ब्लॉक आहे. मंगळवार ते शुक्रवार दरम्यान दररोज दुपारी ३:५० ते सायंकाळी ५:५० या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येईल.ब्लॉक कालावधीत कसारा आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या अनेक उपनगरीय गाड्या देखील आसनगाव येथेच थांबतील किंवा तेथूनच सुरू होतील. ब्लॉक काळात दुपारी ३:३५ वाजता कसारा येथून सुटणारी गाडी आसनगाव येथून दुपारी ४:१२ वाजता सुटेल तसेच दुपारी ४:१६ वाजता कसारा येथून सुटणारी गाडी आसनगाव येथून दुपारी ४:५४ वाजता सुटेल, या व्यतिरिक्त संध्याकाळी ५:०२ वाजता कसारा येथून सुटणारी गाडी आसनगाव येथून संध्याकाळी ५:३९ वाजता सुटेल.
Comments
Add Comment

Poisonous Snakes : मान्सूनमध्ये वाढतो 'या' ४ सापांचा वावर; कोणते आहेत हे जीवघेणे सर्प?

मुंबई : पावसाळा सुरू होताच निसर्ग हिरवागार होतो, मात्र त्याचवेळी विषारी सापांचा (Poisonous Snakes) वावरही मोठ्या प्रमाणात

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र,

Central Railway : लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम! डेक्कन क्वीनसह अनेक एक्सप्रेस गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला