Rajasthan Sandstorm : राजस्थानात वाळूच्या वादळाचा कहर! भरदिवसा अंधार, ताशी ७० किमी वेगाने धुळीचा तांडव; वाहतूक ठप्प

जयपूर : राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आज (३० मे) निसर्गाचा भीतीदायक आणि आश्चर्यकारक अनुभव पाहायला मिळाला. चुरू आणि श्रीगंगानगर परिसरात दुपारी सुमारे २ वाजता अचानक हवामानात मोठा बदल झाला आणि प्रचंड वाळू-धुळीचे वादळ उसळले. काही क्षणांतच आकाश काळवंडले आणि भरदिवसा अंधार पसरला, ज्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. (Rajasthan Sandstorm)



दृष्यमानता शून्य; रस्त्यांवर वाहनांची कोंडी :


या धुळीच्या वादळामुळे दृश्यमानता जवळपास शून्यावर आली. रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली, तर चालकांना पुढील काही मीटरही दिसत नसल्याने हेडलाइट्सचा आधार घ्यावा लागला. अनेक भागांमध्ये नागरिकांनी सुरक्षिततेसाठी घरातच थांबणे पसंत केले. (Rajasthan Sandstorm)



ताशी ७० किमी वेगाने ३० मिनिटांचा तांडव : 


हवामान विभाग आणि स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, या वादळादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी सुमारे ७० किमी इतका नोंदवला गेला. जवळपास 30 मिनिटे वाळू आणि धुळीचे ढग आकाशात फिरत राहिले, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Rajasthan Sandstorm)



वादळानंतर पावसाची हजेरी; तापमानात मोठी घट :


या वादळानंतर लगेचच हवामानाने वेगळेच रूप घेतले. धूळ खाली बसताच आकाश ढगाळ झाले आणि अनेक भागांमध्ये हलक्या ते जोरदार पावसाला सुरुवात झाली. काही दिवसांपासून ४५ अंश सेल्सिअसच्या वर असलेले तापमान अचानक खाली आले. हवामान विभागानुसार, या बदलामुळे तापमानात सुमारे ८ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली असून, नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. (Rajasthan Sandstorm)



देशातील इतर राज्यांमध्येही हवामानाचा कहर :


दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्येही मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. बिहारमध्ये वीज कोसळून १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पाटणामध्ये पावसामुळे विमानसेवा विस्कळीत, अनेक उड्डाणांना उशीर. उत्तर प्रदेशमध्ये मेघगर्जना आणि वादळामुळे ३१ जणांचा मृत्यू. सहारनपूरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक वाहने पाण्यात वाहून गेली. राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पावसाचा अलर्ट जारी. (Rajasthan Sandstorm)



मान्सूनबाबत हवामान विभागाचा अंदाज :


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ७ दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमकुवत राहू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Rajasthan Sandstorm) IMD च्या अहवालानुसार, जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या हंगामात सुमारे ७८ सेमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, राष्ट्रीय सरासरी ८७ सेमी मानली जाते. (Rajasthan Sandstorm)

Comments
Add Comment

IPL Final 2026 : RCB vs GT फायनल : अकासा एअरकडून मुंबई आणि बंगळुरूहून अहमदाबादसाठी विशेष विमानांची घोषणा!

मुंबई : जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) चा अंतिम सामना आता

CUET-UG 2026 : NEET पेपरफुटीचा वाद सुरू असतानाच CUET परीक्षेत मोठा गोंधळ! तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना २ तास प्रतीक्षा; पालक-विद्यार्थ्यांचा संताप

देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, आता कॉमन

Delhi Police : मोठा दहशतवादी कट उधळण्यात दिल्ली पोलिसांना यश! ISI शी संबंधित ९ संशयित अटकेत; ग्रेनेड, स्फोटकांसह घातक शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांवर मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कथित कट दिल्ली

Operation Sindoor 2.0 : भारत पुन्हा अॅक्शन मोडमध्ये! 'ऑपरेशन सिंदूर 2.0' बाबत लष्करप्रमुखांचे मोठे वक्तव्य

- संघर्ष फक्त थांबला आहे, संपलेला नाही; लष्करप्रमुखांच्या वक्तव्याने खळबळ पुणे : भारत ऑपरेशन सिंदूर २.० साठी (Operation

Petrol-Diesel Stock : देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी, नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचा पुरेसा साठा - केंद्र सरकार

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की, देशात

Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’ला दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका; सोशल मीडिया खाते पूर्ववत करण्याबाबत दिला मोठा निर्णय

नवी दिल्ली : अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील ‘कॉकरोच जनता पार्टी’ला (Cockroach Janata Party - CJP) दिल्ली उच्च न्यायालयाकडून