Hardik Pandya Leave Mumbai: आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीनंतर संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी लिलावात हार्दिकवर विक्रमी बोली लागू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवले होते. मात्र गेल्या तीन हंगामांमध्ये संघाला अपेक्षित यश मिळाला नाही. 2026 मध्ये तर मुंबईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला. त्यामुळे व्यवस्थापन आणि चाहत्यांमध्ये नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिकने मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाकडे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तो 20 व्या हंगामात दुसऱ्या संघात जाण्याचा विचार करत आहे. जर तो आगामी आयपीएल लिलावात उतरला, तर त्याच्यावर 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक बोली लागू शकते,असा अंदाज क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. हार्दिकला आपल्या संघात सामील करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे तीन संघ सर्वाधिक उत्सुक असल्याची चर्चा आहे.
मुंबई : जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) चा अंतिम सामना आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. या ...
चेन्नई सुपर किंग्स : चेन्नई सुपर किंग्सला मधल्या फळीत अनुभवी अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. हार्दिकच्या आगमनामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभाग मजबूत होऊ शकतात.
कोलकाता नाईट राइडर्स (KKR) : कोलकाता नाईट रायडर्सला भविष्यासाठी सक्षम कर्णधार हवा आहे. गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिककडे नेतृत्वाचा मोठा अनुभव असल्याने केकेआर त्याच्यावर मोठी बोली लावू शकते.
दिल्ली कॅपिटल्स (DC) : दिल्ली कॅपिटल्सकडे स्टार खेळाडूंची फौज असली तरी दर्जेदार भारतीय अष्टपैलू खेळाडूची कमतरता जाणवली आहे. हार्दिक संघात आल्यास दिल्लीचा समतोल अधिक मजबूत होऊ शकतो.
हार्दिक पांड्याच्या भवितव्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र तो लिलावात उपलब्ध झाला, तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी ट्रान्सफर आणि बोली पाहायला मिळेल यात काही शंका नाही.





