मुंबई : मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड (Coastal Road) प्रकल्पाच्या परिसरात लवकरच मोठ्या प्रमाणावर हरित विकास पाहायला मिळणार आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) कोस्टल रोडच्या शेजारील मोकळ्या जागांवर तब्बल ६० हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला असून, या उपक्रमामुळे शहरातील पर्यावरण संतुलनास मोठी मदत होणार आहे. यासाठी वरळी आणि ब्रीच कँडी परिसरात प्राथमिक कामांना सुरुवात झाली असून, यंदाच्या मान्सूनपूर्वी १५ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
पुढील काही वर्षांत होणार मोठा कायापालट
सध्या कोस्टल रोडलगतच्या परिसरातील मातीची (Soil) तपासणी आणि जमीन तयार करण्याचे काम सुरू आहे. किनारपट्टीच्या वातावरणात कोणत्या प्रकारची झाडे दीर्घकाळ टिकू शकतात, याचा अभ्यास केल्यानंतर टप्प्याटप्प्याने वृक्षलागवड केली जाणार आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत एकूण ६० हजार वृक्षांची लागवड पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुमारे २ लाख झुडुपे आणि विविध वनस्पतींची लागवड करण्याचीही योजना आहे.
शिर्डी : शिर्डीच्या (Shirdi) साईदरबारात श्रद्धा, भक्ती आणि दानशूरतेचं आणखी एक अनोखं उदाहरण समोर आलं आहे. सोन्याच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवरही ...
कोस्टल रोडच्या दक्षिणेकडील १०.६ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी समुद्रातून सुमारे १११ हेक्टर जमीन पुनर्प्राप्त करण्यात आली आहे. यापैकी जवळपास ४० हेक्टर जमीन रस्ते, पूल आणि इंटरचेंजसारख्या (Interchange) पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्र नागरिकांसाठी खुल्या जागा, बागा, शहरी वन, सायकलिंग ट्रॅक आणि पदपथांच्या विकासासाठी राखून ठेवण्यात आले आहे.
वरळी आणि ब्रीच कँडी (Breach Candy) येथे नर्सरी विकसित
या महत्त्वाकांक्षी हरित प्रकल्पासाठी दोन स्वतंत्र नर्सरी (Nursery) विकसित केल्या जात आहेत. वरळी येथील नर्सरी आधीच कार्यरत झाली असून, ब्रीच कँडी परिसरातील नर्सरी लवकरच सुरू होणार आहे. वरळीतील नर्सरीमध्ये विविध प्रकारची झाडे, झुडुपे आणि वनस्पतींची चाचणी सुरू आहे. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खारट आणि दमट हवामानात कोणत्या प्रजातींची झाडे अधिक चांगली वाढतात, याचा अभ्यास केला जात आहे.
विजापूर : जमिनीच्या वादातून नातेसंबंध रक्तरंजित झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील (Karnataka) विजापूर (Vijapur) जिल्ह्यात घडली आहे. शेतजमिनीच्या वादातून सहा ...
वृक्षलागवडीपूर्वी माती तयार करण्याची प्रक्रिया
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जमीन समुद्रातून पुनर्प्राप्त करण्यात आल्यामुळे वृक्षलागवडीपूर्वी मातीची योग्य तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी संबंधित भागात मुरम मातीचे थर टाकून जमीन मजबूत केली जात आहे. जमिनीखाली सुमारे ९०० मिलीमीटर जागा या प्रक्रियेसाठी राखीव ठेवण्यात आली होती. यापूर्वी ४०० मिलीमीटर मुरमाचा थर टाकण्यात आला असून, आता वृक्षलागवडीसाठी आवश्यक सुपीक माती भरण्याचे काम वेगाने सुरू आहे.
रिलायन्स फाउंडेशनकडून CSR अंतर्गत काम
हा संपूर्ण प्रकल्प रिलायन्स फाउंडेशनकडे CSR (Corporate Social Responsibility) उपक्रमांतर्गत सोपविण्यात आला आहे. त्यामुळे या हरित विकास प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेला कोणताही अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार नाही. फेब्रुवारी महिन्यात तत्कालीन बीएमसी आयुक्त भूषण गगरानी यांच्या उपस्थितीत ‘कोस्टल रोड गार्डन’चा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
मुंबई : आयपीएल २०२६ च्या (IPL 2026) दुसऱ्या क्वालिफायरमध्ये (Qualifier) गुजरात टायटन्सने (GT) राजस्थान रॉयल्सचा (RR) ७ विकेट्स राखून पराभव करत थेट अंतिम फेरीत धडक मारली. ...
महापालिकेच्या अंदाजानुसार, पुढील २४ महिन्यांत संपूर्ण लँडस्केपिंग आणि हरित विकास प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. याशिवाय महालक्ष्मी मंदिराजवळ आध्यात्मिक क्षेत्र विकसित करण्याचे नियोजन असून, हाजी अली पुलाखाली टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची विशेष जागा तयार करण्याचाही विचार महापालिका प्रशासन करत आहे.






