Supreme Court : ‘तारीख पे तारीख’ला लागणार पूर्णविराम! हायकोर्टांना सुप्रीम कोर्टाची कडक डेडलाइन; राखीव निकाल ३ महिन्यांत देणे बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील न्यायालयांमध्ये प्रलंबित खटले आणि निकाल देण्यास होणारा विलंब यावर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) मोठे पाऊल उचलले आहे. न्यायप्रक्रियेला गती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आणि बंधनकारक मार्गदर्शक सूचना जारी करत हायकोर्टांना राखीव ठेवलेले निकाल जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या आत देणे अनिवार्य केले आहे.


मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात जामीन प्रकरणांमध्ये शक्यतो दुसऱ्याच दिवशी निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जामीन मंजूर झाल्यानंतर संबंधित आदेश तातडीने जेल प्रशासनाला कळवणेही बंधनकारक करण्यात आले आहे.


सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्पष्ट केले की, न्यायालयात निकालाचा केवळ मुख्य भाग (ऑपरेटिव्ह पार्ट) तत्काळ जाहीर केला जाईल, मात्र त्यामागील सविस्तर कारणे सात दिवसांच्या आत न्यायालयाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे आवश्यक असेल. जर 30 दिवसांच्या आत कारणे अपलोड झाली नाहीत, तर संबंधित प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग करण्याचा पर्याय खुला राहील.



तसेच, एखादा निकाल राखून ठेवण्यात आल्याची तारीख हायकोर्टाच्या वेबसाइटवर स्पष्टपणे दर्शवणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर तीन महिन्यांच्या कालावधीत निकाल दिला गेला नाही, तर रजिस्ट्रार जनरल हे प्रकरण मुख्य न्यायाधीशांसमोर मांडतील. त्यानंतर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आणखी दोन आठवड्यांची मुदत देऊ शकतील. तरीही आदेशाचे पालन न झाल्यास प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे सोपवले जाऊ शकते. (Supreme Court)


सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) वैयक्तिक स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरणांना विशेष प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. अंडरट्रायल कैद्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्याच दिवशी किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी मुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याबाबत ट्रायल कोर्टाने हायकोर्टाला पालन अहवाल सादर करणे आवश्यक असेल.



दरम्यान, हायकोर्टांच्या रजिस्ट्रार जनरलना या नव्या मार्गदर्शक सूचना संबंधित मुख्य न्यायाधीशांसमोर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोशल मीडिया आणि न्यायालयीन प्रक्रियेतील वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.


ही संपूर्ण बाब झारखंड हायकोर्टातील एका प्रकरणामुळे समोर आली. काही याचिकाकर्त्यांनी तक्रार केली होती की, त्यांच्या फौजदारी अपीलांवरील अंतिम युक्तिवाद पूर्ण होऊनही दोन ते तीन वर्षांपासून निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) देशातील सर्व हायकोर्टांकडून अशा प्रकरणांचा अहवाल मागवत व्यापक सुनावणी घेतली आणि आता हे कठोर निर्देश जारी केले आहेत.


सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) या आदेशामुळे न्यायप्रक्रियेला वेग मिळण्याची आणि नागरिकांना वेळेत न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Mahadev Betting App : महादेव ॲप सट्टेबाजी प्रकरणी सीबीआयकडून ११ आरोपपत्रे दाखल

नवी दिल्ली: महादेव ॲप ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने गुरुवारी एक मोठी कारवाई करत

PM Narendra Modi in Melbourne : ऑपरेशन सिंदूर’चा डंका जगभर, मेलबर्नमध्ये ३० हजार भारतीयांसमोर पंतप्रधान मोदींचा ठाम संदेश

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी मेलबर्न

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतली ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांची भेट

मेलबर्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी मेलबर्न

DRDO : डीआरडीओकडून ‘पिनाका’ लांब पल्ल्याच्या मार्गदर्शित रॉकेटची यशस्वी उड्डाण चाचणी

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) 8 जुलै 2026 रोजी चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावर

Amayra Suicide Case : वर्गशिक्षिकेकडे वारंवार मदत मागितली पण.., अमायराच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

अमायराच्या आत्महत्याप्रकरणी  शाळेच्या भूमिकेवर प्रश्न, त्या क्षणाच्या व्हिडिओ व्हायरल  जयपूर : जयपूरमधील (Jaipur)

Agra ARTO Raid : माजी सरकारी अधिकाऱ्याच्या घरात 'कुबेराचा खजिना'; २२ किलो सोनं-चांदी, १.६२ कोटींची रोकड जप्त

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथे एका माजी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या (ARTO) घरावर टाकलेल्या