नवी दिल्ली : देशविरोधी कारवायांवर मोठा प्रहार करत राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने आज म्हणजेच शुक्रवार २९ मे रोजी देशभरात व्यापक छापेमारी मोहीम राबवली. पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी जाळे आणि ड्रोनच्या माध्यमातून भारतात शस्त्रे व स्फोटके पाठवण्याच्या कटाशी संबंधित प्रकरणात एनआयएने उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि महाराष्ट्रातील तब्बल १२ ठिकाणी एकाचवेळी धाड टाकली. (NIA Raids)
एनआयएच्या पथकांनी उत्तर प्रदेशात ५, राजस्थानात २, बिहारमध्ये २ आणि महाराष्ट्रात ३ ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे. छापेमारीदरम्यान डिजिटल उपकरणे, मोबाईल, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात येत असून त्याची सखोल तपासणी सुरू आहे. (NIA Raids)
नवी दिल्ली : देशांतर्गत शेअर बाजारात (Stock Market) शुक्रवारी सकाळच्या सत्रात मोठी चढ-उताराची स्थिती पाहायला मिळाली. व्यवहाराच्या सुरुवातीलाच बाजारात ...
तपास यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, या जाळ्याचा उद्देश देशातील विविध भागांमध्ये मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणणे हा होता. पंजाब, दिल्लीसह इतर संवेदनशील भागांना लक्ष्य करण्यासाठी या शस्त्रांचा वापर करण्याचा कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे. सामान्य नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेला मोठे नुकसान पोहोचवून देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा या कटामागील हेतू असल्याचेही सूत्रांनी सांगितले. (NIA Raids)
नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या हंगामात जगभरात गोडवा पसरवणाऱ्या भारतीय आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठा झटका बसला आहे. जपान सरकारने (Japan's government) चालू ...
या सर्व आरोपींविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA), भारतीय न्याय संहिता तसेच स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून युवकांना कट्टरतावादाकडे वळवून त्यांना या जाळ्यात सहभागी करून घेतले जात असल्याचा दावा एनआयएने केला आहे. एनआयए सध्या फरार आरोपींचा शोध घेत असून या दहशतवादी नेटवर्कचे देशातील आणि परदेशातील इतर दुवे शोधण्याचे कामही वेगाने सुरू आहे. (NIA Raids)