Mumbai Railway Food Price Hike Cancelled : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! वडापाव, समोसा आणि पफचे दर जैसे थे

मुंबई : मध्य रेल्वेने १ जूनपासून वडापाव आणि इतर खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे लाखो रेल्वे (Railway) प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून रेल्वे स्थानकांवरील (Railway Station) वडापाव, समोसा आणि इतर लोकप्रिय खाद्यपदार्थांचे दर सध्या तरी पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहेत. या निर्णयामुळे मुंबईकरांच्या खिशावर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार टळला आहे.


मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेला वडापाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पावसाळा (Monsoon) असो, प्रवासादरम्यान लागलेली छोटी भूक असो किंवा चटकदार खाण्याची इच्छा असो, वडापाव हा अनेकांचा पहिला पर्याय असतो. मात्र मध्य रेल्वेच्या (Central Railway) स्टॉलवर (Stall) मिळणाऱ्या वडापावच्या किमतीत वाढ होणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.



मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दरात १ जून २०२६ पासून वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार वडापाव, समोसा, व्हेज पफ, साबुदाणा वडा यांसारख्या लोकप्रिय पदार्थांच्या किमती वाढवण्यात येणार होत्या. मात्र आता हा प्रस्ताव स्थगित करण्यात आला असून पुढील आदेश मिळेपर्यंत जुन्याच दराने खाद्यपदार्थ विक्री करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


मध्य रेल्वे बॅकफूटवर, दरवाढीचा निर्णय रद्द


रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थांचे दर वाढवण्याचा निर्णय मागे घेतल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेषतः दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. दरवाढ लागू झाल्यास रोजच्या प्रवासाच्या खर्चात आणखी वाढ झाली असती. येत्या १ जूनपासून वडापाव आणि समोस्याच्या किंमती वाढवण्याचा प्रस्ताव होता. तसेच रेल्वे स्टॉलवर काही नवीन खाद्यपदार्थांचाही समावेश करण्यात येणार होता. मात्र आता पुढील सूचना येईपर्यंत सर्व खाद्यपदार्थ जुन्याच दराने उपलब्ध राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



किती वाढणार होते खाद्यपदार्थांचे दर?


अलीकडच्या काळात इंधन आणि गॅसच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे खाद्यपदार्थांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण देत मध्य रेल्वेने दरवाढीचा प्रस्ताव तयार केला होता. यामुळे रेल्वे स्थानकांवरील अनेक लोकप्रिय पदार्थ महाग होणार होते.


प्रस्तावित दरवाढीनुसार सध्या १३ रुपयांना मिळणारा वडापाव थेट २० रुपयांना मिळणार होता. याशिवाय व्हेज समोसा, व्हेज पफ आणि साबुदाणा वडा यांची किंमतही २० रुपये करण्यात येणार होती. तसेच प्रवाशांमध्ये लोकप्रिय असलेली पावभाजी ५० रुपयांना उपलब्ध होणार होती. व्हेज पिझ्झाची किंमतही ५० रुपये निश्चित करण्यात आली होती. दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये मसाला डोसा ३५ रुपयांना आणि सांबार-चटणीसह दोन इडली ३० रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होणार होत्या.



मात्र मध्य रेल्वेने दरवाढीचा निर्णय मागे घेतल्याने हे सर्व प्रस्तावित दर सध्या लागू होणार नाहीत. त्यामुळे वडापावपासून ते इतर खाद्यपदार्थांपर्यंत सर्व वस्तू जुन्याच किमतीत उपलब्ध राहणार आहेत. परिणामी, रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून 1 जूनपासून होणाऱ्या संभाव्य दरवाढीपासून त्यांची सुटका झाली आहे.

Comments
Add Comment

SRH vs RR Eliminator : आज IPL मध्ये होणार सर्व्हायव्हल वॉर; राजस्थान विरुद्ध हैदराबादमध्ये निर्णायक लढत, हरला तो थेट स्पर्धेबाहेर!

IPL PLAYOFF : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हायव्होल्टेज

Central Railway Stations Food Stalls : मध्य रेल्वेच्या स्थानकांवर वडापाव, समोसा, भेळ महागणार; १ जूनपासून नवे दर लागू

मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) उपनगरीय आणि प्रमुख स्थानकांवर मिळणारे लोकप्रिय स्नॅक्स आणि खाद्यपदार्थ १ जून

MHADA Lottery 2026 : म्हाडा लॉटरी २०२६ ला प्रचंड प्रतिसाद! मुंबईतील २,६४० घरांसाठी ८२ हजारांहून अधिक अर्ज; अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख जाणून घ्या!

मुंबई : मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी म्हाडाची (MHADA Lottery 2026) घरांची सोडत मोठी

Weastern Railway : पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण

मुंबई : पश्चिम रेल्वेने आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव