विधानपरिषदेचे जागावाटप मुंबईतच अंतिम होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नाशिक, छत्रपती संभाजी नगर, पुण्याचा तिढा कायम

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधानपरिषद निवडणुकांच्या १७ जागांसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला असून केवळ २ ते ३ जागांवर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. हा जागावाटपाचा तिढा दिल्लीत नव्हे, तर मुंबईतच मित्रपक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून सोडवतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. महायुतीमध्ये सध्या नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागांवरून शिवसेनेसोबत (शिंदे गट), तर पुण्याच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेससोबत (अजित पवार गट) भाजपची चर्चा सुरू असून, हा तिढा लवकरच सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


नवी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्यासमवेत साखर उद्योगासंदर्भातील एका महत्त्वाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपावर भाष्य केले. "विधानपरिषद निवडणुकीबाबत आमचे जवळपास एकमत (अॅग्रीमेंट) झालेले आहे. फक्त नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागा आम्हाला मिळाव्यात, असा आमचा शिवसेनेकडे आग्रह आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्याकडे पुण्याच्या जागेची मागणी केली आहे. सध्या याच जागांवरून चर्चा अडकली असली, तरी आम्ही ती सकारात्मकतेने सोडवून घेऊ," असे फडणवीस म्हणाले. महायुतीसमोरील जागावाटपाचा 'कठीण पेपर' संपला असून आता केवळ 'सोपा पेपर' सोडवून त्यावर 'टीकमार्क' करणे बाकी आहे, असेही त्यांनी सांगितले



उमेदवारी अर्ज भरतानाच चित्र स्पष्ट होणार


महायुतीच्या संभाव्य जागावाटपानुसार, १७ पैकी सर्वाधिक १२ जागांवर भाजप निवडणूक लढवण्याची चिन्हे असून, शिवसेनेला ३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागा मिळण्याची चर्चा आहे. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विधानपरिषदेच्या बाबतीत इतक्या आधी गोष्टी निश्चित होत नसतात, त्या वेळेवरच होतात. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यातच जागावाटप आणि उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा मुंबईतूनच केली जाईल.

Comments
Add Comment

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या

विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी

IPL संपलं, आता FIFA World Cup 2026 चा फिव्हर! विराटपासून धोनीपर्यंत… कोणता भारतीय क्रिकेटर कुठल्या फुटबॉल स्टारचा फॅन?

IPL 2026 आता शेवटच्या टप्प्यात आहे. ३१ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना आहे. त्यानंतर क्रिकेटप्रेमींचं लक्ष थेट FIFA World Cup 2026

SRH vs RR Eliminator : 15 वर्षांच्या वैभवचे वादळ! 29 चेंडूत 97 धावा; ख्रिस गेलचाही विक्रम तुटला, हैदराबाद हादरलं...

Vaibhav Sooryvanshi : आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अक्षरशः धुमाकूळ घालत

Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू

USA : अमेरिका माघार घेणार, US नेव्ही इराणपासून दूर जाणार; होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी संपुष्टात येणार ?

वॉशिंग्टन डीसी : इराणला बेचिराख करण्याची आणि त्यांची संस्कृती संपवून टाकण्याची धमकी देणाऱ्या अमेरिकेने

Nashik : नाशिक विधान परिषद निवडणुकीची चुरस वाढली, आतापर्यंत 'इतक्या' उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर 17 सदस्यांची निवड होणार आहे. आमदार म्हणून विधान परिषदेवर