Nitesh Rane : आदित्य ठाकरेंनी दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा स्वतःचा मतदारसंघ सांभाळावा!

- मंत्री नितेश राणे यांची टीका; ज्यांना 'बेस्ट'ची निवडणूक जिंकता आली नाही त्यांनी भाजपवर बोलू नये


मुंबई : बिहारमधील पोटनिवडणुकीतील पराभवावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधणाऱ्या उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरेंनी भाजपवर बोलण्यापेक्षा आधी स्वतःचा वरळी मतदारसंघ सांभाळावा, २०२९ ची निवडणूक त्यांना अत्यंत कठीण जाणार आहे, असा टोला राणे यांनी लगावला. ( Aditya Thackeray)


एका पोटनिवडणुकीतील पराभवाने विरोधकांना खूप आनंद झाला असला तरी जनमताचा नेहमीच आदर केला पाहिजे, असे सांगत नितेश राणे म्हणाले की, नुकतीच मुंबईत झालेली 'बेस्ट' पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. दोन्ही ठाकरे एकत्र लढूनही तोंडावर आपटले, मग आता मराठी माणसाने यांना लाथ मारून हकलवून लावले असे आम्ही म्हणायचे का, असा सवाल त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्येही भाजपचे सरकार आले असून आमचा मुख्यमंत्री तेथे बसला आहे, याची आठवणही त्यांनी या वेळी करून दिली.


राज्यात नव्याने लागू झालेल्या 'महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याचे' स्वागत करताना नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे कौतुक केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेले आश्वासन पूर्ण करत हा कायदा अधिवेशनात संमत करण्यात आला असून राष्ट्रपतींचीही त्याला मंजुरी मिळाली आहे. या कायद्यामुळे राज्यातील हिंदू माता-भगिनींकडे नावाने वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले. (BJP Maharashtra)




जरांगे आणि सरकारमध्ये उत्तम संवाद


दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ७ ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा सुरू करत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबाबत बोलताना राणे यांनी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. मनोज जरांगे आणि सरकारमध्ये उत्तम संवाद असून, बैठकीच्या माध्यमातून सर्व प्रश्नांवर नक्कीच मार्ग काढला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या होत्या आणि पुढेही सकारात्मक चर्चा करून योग्य निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Nashik Crime News : जादुटोणा करून पतीला ठार मारू ! त्र्यंबकेश्वरच्या ठगांनी महिलेला धमकावत दीड लाख लुटले

Nashik Crime News : अंधश्रद्धेच्या विळख्यातून आजही अनेक लोक अडकून पडले आहे. अर्थात त्या लोकांना त्याचे परिणाम आर्थिक,

Mumbai Metro : एमएमआरडीए मेट्रोचा नवा विक्रम! ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार; अवघ्या १७९ दिवसांत शेवटचे ५ कोटी प्रवासी

मार्गिका २अ, ७, २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) वर वाढता प्रतिसाद; सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७९ लाखांवर मुंबई :

Devendra Fadnavis : शिक्षणमहर्षी डॉ डी. वाय. पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

समाजकारण- राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपला https://prahaar.in/2026/08/04/old-monk-a-massive-blow-for-liquor-lovers-fssai-cracks-down-on-six-brands-including-old-monk-what-exactly-is-the-reason/ मुंबई :

Nashik Rain Update : अहिल्यानगरमध्ये ११२% पाऊस, तर नाशिकमध्ये....; नाशिक विभागातील जिल्ह्यांची स्थिती काय ?

Nashik Rain Update :गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाने धुव्वादार बॅटिंग केली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील नदी नाले भरले

Nashik : जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेला अन् नको ते घडलं ! एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत

Nashik : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील शिवडी गावाजवळील पालखेड कालवा

Old Monk : मद्यप्रेमींना सर्वात मोठा धक्का! 'ओल्ड मंक'सह ६ ब्रँड्सवर FSSAI चा थेट दणका, नेमकं कारण काय?

भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) मद्य उद्योगातील नियमभंगाविरोधात मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील