Modi : मोदी सरकारने केलेल्या ३ सुधारणांमुळे ८० कोटी रेशनधारकांना होणार फायदा

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार दर महिन्याला ८० कोटी लोकांना अन्नधान्याचा (रेशन) पुरवठा करत आहे. ही योजना योग्य पद्धतीनं सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं 'अर्थक-पीडीएस' योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. या अंतर्गत काही मोठे बदल करण्यात आले आहेत. या सुधारणांचा लाभ गरीब कुटुंबांना होईल. या सुधारणांमुळे राज्यांना मदत होईल. सोबतच अन्नधान्याची चोरी रोखली जाईल.



सार्वजनिक वितरण व्यवस्था (पीडीएस) म्हणजेच अन्न पुरवठा व्यवस्था अधिक मजबूत, आधुनिक आणि पारदर्शक करण्याचा सरकारचा हेतू असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. यासाठी केंद्र सरकारनं २५,५३० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या योजनेच्या अंतर्गत तीन विशेष बदल करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सरकारांना पाठिंबा देणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि आता पीडीएस लाभार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी एआय चा वापर करणे यांचा समावेश आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) मोठ्या गोदामांमधून प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, तालुक्यांपर्यंत आणि अखेरीस शिधावाटप दुकानांपर्यंत धान्य पोहोचवताना राज्य सरकारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता केंद्र सरकार राज्यांना आर्थिक मदत देईल.



दुसरा बदल म्हणजे रेशन दुकान मालकांचे कमिशन वाढवले जाईल. केंद्रीय मंत्री म्हणाले, "रेशन डीलर्सचे कमिशन बऱ्याच काळापासून वाढवण्यात आले नव्हते. डीलर कमिशन वाढवण्याची सातत्याने मागणी होत होती. आज सरकारने ही मागणी मान्य करून त्यांचे कमिशन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तिसरा आणि अंतिम बदल म्हणजे संपूर्ण शिधावाटप प्रणाली अधिक आधुनिक आणि पारदर्शक बनवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे.



केंद्रीय मंत्री म्हणाले, "सरकार या भव्य अर्थसंकल्पातून शिधावाटप वितरणाचा खर्च भागवेल, दुकानदारांची कमाई वाढवेल आणि संपूर्ण प्रणालीचे डिजिटलीकरण व आधुनिकीकरण करेल. सध्याच्या उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीवर सर्व मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांचा संदेश देशाला पोहोचवण्यासाठी अनेक ट्विट्स करण्यात आले. त्या संदेशाला प्रतिसाद म्हणून, प्रत्येक मंत्रालय आणि विभाग आपापल्या अधिकारक्षेत्रात कोणती विशिष्ट पावले उचलू शकतात, यावर चर्चा करण्यात आली."

Comments
Add Comment

World Chess Championship : गुकेश आणि सिंदारोव्ह यांच्यातील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढत जिनिव्हामध्ये रंगणार

नवी दिल्ली : विद्यमान जागतिक विजेता गुकेश डी आणि आव्हानवीर जावोखिर सिंदारोव्ह यांच्यातील २०२६ ची जागतिक

Dr Shrikant Shinde : ‘जीमॅट’, ‘जीआरई’प्रमाणे भारतात परीक्षा पद्धती लागू करा - डॉ. श्रीकांत शिंदे

नवी दिल्ली : अमेरिकेत जीमॅट, ‘जीआरई’च्या परीक्षा वर्षातून अनेकदा घेतल्या जातात आणि त्यांचा निकाल लगेच घोषीत

Anti Paper Leak Bill : ‘अँटी पेपर लीक’ विधेयकावर लोकसभेत खडाजंगी

नवी दिल्ली : लोकसभेत अँटी पेपर लीक विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार

Mangal Milan NDA Meeting : एनडीए संसदीय पक्षाची 'मंगल मिलन' बैठक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीए संसदीय पक्षाची 'मंगल मिलन' बैठक नुकतीच पार पडली.  या

Union Minister Jitendra Singh : परीक्षा सुधारणा विधेयक भारतीय संसदेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल - केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

नवी दिल्ली : लोकसभेत सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांच्या प्रतिबंधासाठी) सुधारणा विधेयक, २०२६ वर चर्चा सुरू झाली

Maharashtra Rain Alert : 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान