Nashik :नाशिकच्या TCS मध्ये कॉर्पोरेट जिहाद तर मुंबईत बँक जिहाद ? नरिमन पॉइंटच्या शाखेतील धक्कादायक घटना

मुंबई : नाशिकच्या TCS मधील कॉर्पोरेट जिहादचे प्रकरण उजेडात आले, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि कायदेशीर कारवाई सुरू झाली. हे प्रकरण ताजे असतानाच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून बँक जिहादचे वृत्त आले आहे. धक्कादायक म्हणजे मंत्रालयापासून जवळ नरिमन पॉइंट परिसरात बँक जिहाद सुरू असल्याची बातमी आली आहे.


मुंबईतील बड्या बँकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. महिलेचा पती एका खासगी कंपनीत कार्यरत आहे.


पतीच्या तक्रारीनुसार मागील काही दिवसांपासून त्याच्या पत्नीचे वर्तन इस्लाम धर्मीय महिलांसारखेच झाले आहे. ती इस्लाम धर्माकडे वळली असून त्या धर्मातील चालीरीतींचे पालन करू लागली आहे. महिलेने स्वतःच्या आठ वर्षांच्या मुलीचंही धर्मांतर करण्याची इच्छा बोलून दाखवली. हे ऐकून पतीला जबर मानसिक धक्का बसला. त्याने ही बाब जवळच्या लोकांना सांगितली आणि बँक जिहादचं वृत्त सार्वजनिक झालं.


बँकेतले काही कर्मचारी महिलेवर धर्मांतरासाठी दबाव टाकत आहेत, असा आरोप तक्रारदार पतीने केला आहे. पत्नीचे बँकेतील एका सहकाऱ्यासोबत संबंध असून त्याच व्यक्तीनं तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव किंवा प्रभाव टाकल्याचा संशय पतीने व्यक्त केला आहे. हिंदू महिलांना आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या जाळ्यात ओढून त्यांचं धर्मांतर करणं या हेतूने काही जण बँकेत कार्यरत आहे, असा आरोप तक्रारदार पतीने केला आहे. पीडित महिलेचे आर्थिक शोषण पण सुरू आहे. या महिलेला बँकेतून कर्ज काढायला लावलं होतं आणि त्या कर्जाची मोठी रक्कम संबंधित व्यक्तीच्या खात्यावर वळवण्यात आली होती. अशा प्रकारे एका सुशिक्षित आणि जबाबदार पदावर असलेल्या महिलेला पद्धतशीरपणे जाळ्यात अडकवून तिला धर्मांतराच्या उंबरठ्यावर उभं केल्याची तक्रार महिलेच्या पतीने केली आहे.



प्रकरण हाताबाहेर जात असल्याची जाणीव होताच पतीने पत्नी आणि मुलीला राजस्थानमधील उदयपूर येथील मूळ गावी नेले. तिथेही या जिहादी प्रवृत्तीने पाठलाग केला. गावातील घरातून १८ एप्रिल २०२६ रोजी पत्नी आणि मुलगी दोघी गायब झाल्या. संबंधित बँकेचा कर्मचारी त्यांना तिथून घेऊन गेल्याचा संशय पतीला आहे. याप्रकरणी उदयपूरमधील सुखेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस तपास करत आहेत. पीडित पतीने बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडेही लेखी तक्रार केली आहे. आपल्या पत्नीची तातडीने उदयपूर किंवा आसपासच्या परिसरात बदली करण्यात यावी, जेणेकरून तिला या जाळ्यातून बाहेर काढता येईल, अशी विनंती पतीने केली आहे. पण बँक व्यवस्थापनाने सध्या या मुद्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. प्रसारमाध्यमां

Comments
Add Comment

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Mumbai Crime : हायप्रोफाइल टॉवरमध्ये सुरू होता ड्रग्जचा काळाबाजार; उग्र वासामुळे पोलिसांनी टाकला छापा, मैत्रिणीसह तिघे ताब्यात...

Crime News : दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील हायप्रोफाइल यास्मीन टॉवरमध्ये सुरू असलेला ड्रग्जचा मोठा रॅकेट मुंबई

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे.

मुंबईसह महत्त्वाच्या शहरांत मिळणार गरमागरम ‘मत्स्य पाव’- मंत्री नितेश राणे

 मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; रोजगारनिर्मितीसाठी राबवणार मोबाईल फूड व्हॅन योजना मुंबई : राज्यातील

लालपरीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ‘पालक अधिकारी’ नेमणार;  मंत्री प्रताप सरनाईक

 मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; प्रत्येक आगाराला उत्पन्नाचे टार्गेट देणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग