Virat Kohli : प्लेऑफमध्ये विराट पुन्हा ठरणार फ्लॉप? आकडे पाहून RCB चाहत्यांची वाढली धाकधूक...

IPL PLAYOFF : आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. या साामन्यात सर्वांचे लक्ष्य विराट कोहलीच्या कामगिरीवर असणार आहे. साखळी फेरीत विराटने अपेक्षाप्रमाणे संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. आरसीबीसाठी विराट यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणार फलंदाज आहे. मात्र विराट पेलऑफमध्ये अनेकदा चांगली कामगिरी करु शकला नाही आहे. त्यामुळे मोठ्या सामन्यापूर्वी आरसीबी चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे.


विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 281 सामन्यांत 9,218 धावा केल्या आाहेत. तो स्पर्धेतील महान फलंदांजपैकी एक आहे. त्याच्या नावावर 9 शतके आणि 67 अर्धशतके आहेत. मात्र प्लेऑफमधील आकडे पाहिले तर चित्र थोडे वेगळे दिसत आहे. विराटने 17 प्लेऑफ सामन्यांत फक्त 396 धावा केल्या आहेत. यात त्याची सरासरी 26.40 इतकीच आहे. त्याने प्लेऑफ सामन्यात केवळ दोन अर्धशतके झळकावले आहेत. यात तो एकदा शून्यावरही बाद झाला आहे. त्यामुळे मोठ्या दबावाच्या सामन्यांत विराटची कामगिरी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे.


यंदाचा हंगाम विराटसाठी खास ठरला आहे. त्याने 14 डावांत 557 धावा केल्या आहेक. तो आरसीबीच्या फलंदाजीचा कणा बनला आहे. 50 पेक्षा जास्तच्या सरासरी आणि 163 च्या स्ट्राइक रेटने खेळताना विराटने आक्रमक फलंदाजीचे नवे रूप दाखवले आहे. पॉवरप्लेमध्ये वेगवान सुरुवात देण्यापासून तर शेवटपर्यंत डाव सावरण्याची जबाबदारी त्याने उत्कृष्टपणे पार पाडली आहे.मात्र आजचा सामना सोपा नसेल. गुजरातकडे कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि राशिद खानसारखे अनुभवी गोलंदाज आहेत. यात रबाडाने विराटला अनेकदा अडचणीत टाकले आहे. त्यामुळे क्वालिफायरमध्ये विराटची बॅट चालते की पुन्हा प्लेऑफचा दबाव त्याच्यावर भारी पडतो, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील