DCM Eknath Shinde : शिंदेंच्या नेतृत्वाखालील लोकप्रतिनिधींची संसदेत दमदार छाप; पाच खासदारांना ‘संसद रत्न’ सन्मान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून खासदारांना कौतुकाची थाप



मुंबई : महाराष्ट्राच्या प्रश्नांना संसदेत प्रभावीपणे वाचा फोडणाऱ्या आणि जनतेच्या हितासाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या शिवसेना व महायुतीच्या खासदारांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत प्रतिष्ठेच्या ‘संसद रत्न’ पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसेच महायुतीचे खासदार डॉ. हेमंत सवरा, मेधा कुलकर्णी आणि स्मिता वाघ यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन करत ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे.



उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे की, जनतेच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहून संसदेत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मांडणी करणाऱ्या लोकप्रतिनिधींनाच अशा प्रकारची राष्ट्रीय पातळीवरील मान्यता मिळते. संसद रत्न पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व खासदारांनी लोकहिताचे प्रश्न, विकासकामे, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय आणि राज्याच्या विविध विषयांवर सातत्याने आवाज उठवत संसदीय कामकाजात उल्लेखनीय योगदान दिले आहे.


शिंदे म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत संसद हे जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा व्यक्त करण्याचे सर्वोच्च व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठावर महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचे काम या खासदारांनी अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे केले आहे. संसदीय चर्चांमधील सक्रिय सहभाग, प्रश्नोत्तरांमधील उपस्थिती आणि जनतेच्या प्रश्नांबाबतचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.



विशेषतः डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदीय गटनेते म्हणून पक्षाची भूमिका सक्षमपणे मांडत विविध विकासात्मक विषयांवर भरीव योगदान दिले आहे. नरेश म्हस्के यांनीही लोकांच्या दैनंदिन प्रश्नांपासून ते व्यापक विकासाच्या मुद्द्यांपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला. तसेच डॉ. हेमंत सवरा, मेधा कुलकर्णी आणि स्मिता वाघ यांनी संसदीय कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.


"राजकारण हे केवळ सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे व्रत आहे. जनतेसाठी काम करणाऱ्या आणि त्यांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींचा गौरव होणे ही लोकशाहीसाठी सकारात्मक बाब आहे. संसद रत्न पुरस्कार हा त्यांच्या कर्तृत्वाचा, अभ्यासू वृत्तीचा आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचा सन्मान आहे," असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.



या सर्व खासदारांनी भविष्यातही अधिक जोमाने आणि तितक्याच समर्पणाने जनतेची सेवा करत महाराष्ट्राचा आवाज संसदेत अधिक प्रभावीपणे पोहोचवावा, अशा शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व ‘संसद रत्न’ पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले. "महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींचा सन्मान म्हणजे राज्याच्या प्रगतीचा गौरव आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local Train Crime : लोकलमधील किरकोळ वादाचं भीषण रूप; मध्यरात्री घडली धक्कादायक घटना

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) लोकल ट्रेनमध्ये (Local Train) पुन्हा एकदा धक्कादायक गुन्ह्याची (Crime) घटना समोर आली आहे. मध्यरात्री

Devendra Fadnavis : सुमार कामगिरी करणाऱ्यांना मुख्यमंत्री देणार नारळ?

- मंत्रिमंडळात फेरबदलांचे संकेत; चांगले काम करणाऱ्या मंत्र्यांचे 'प्रमोशन' मुंबई : महायुती सरकारमध्ये सुमार

Chandrashekhar Bawankule : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’साठी ९१ विधानसभा मतदारसंघांत 'सह अध्यक्षां'ची नेमणूक; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या

Narendra Modi : सीईटीए' करारामुळे शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमईंना नवी गती : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील 'सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार' आणि ऐतिहासिक 'सामाजिक

Jaykumar Gore : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून २८ जून पासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून २

PoK : पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात PoK मध्ये 12 नागरिकांचा मृत्यू

मुझफ्फराबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK)मध्ये सरकारविरोधी आंदोलन अधिक तीव्र झाले असून, मंगळवारी आंदोलक आणि