नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ट्विशा शर्मा (Twisha Sharma Case) मृत्यू प्रकरणावर आज म्हणजेच सोमवार २५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या ट्विशाचा मृतदेह भोपाळमधील सासरी संशयास्पद परिस्थितीत आढळल्यानंतर या प्रकरणाने राष्ट्रीय पातळीवर मोठं वादळ निर्माण केलं आहे. मानसिक छळ, कौटुंबिक दबाव, हुंडा आणि “समाज काय म्हणेल?” या भीतीमुळे एका तरुणीचा जीव गेला का, असा प्रश्न आता देशभरातून उपस्थित केला जात आहे.
लग्नानंतर सुरू झाला होता मानसिक त्रास?
ट्विशाच्या (Twisha Sharma Case) कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार, लग्नानंतर काही दिवसांतच तिला मानसिक आणि भावनिक त्रासाला सामोरं जावं लागत होतं. हनिमूनदरम्यान पतीने गैरवर्तन केल्याची माहिती ट्विशाने आपल्या भावाला दिली होती. मात्र संसार टिकवण्यासाठी तिने सर्व सहन करण्याचा प्रयत्न केला.
भोपाळ : ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात (Twisha Sharma Death Case) दररोज नवे खुलासे आणि प्रश्न समोर येत आहेत. आता सर्वांचे लक्ष ट्विशा शर्माच्या दुसऱ्या शवविच्छेदन (Post-Mortem) ...
“आम्ही तिला वाचवू शकलो नाही” :
ट्विशाच्या (Twisha Sharma Case) वडिलांनी एका मुलाखतीत मोठी कबुली दिली. “आम्ही तिला त्या घरातून बाहेर काढायला हवं होतं. आम्ही उशीर केला,” असे त्यांनी म्हटले. या वक्तव्यानंतर समाजातील विवाह आणि प्रतिष्ठेच्या दबावावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
सासरच्या कुटुंबाकडून गंभीर आरोप :
ट्विशाच्या (Twisha Sharma Case) मृत्यूनंतर तिच्या सासूकडून अनेक धक्कादायक दावे करण्यात आले. ट्विशावर मानसिक अस्थिरता, नातेसंबंधांबाबत संशय आणि घरगुती जबाबदाऱ्या न पाळल्याचे आरोप करण्यात आले. यामुळे प्रकरण आणखी तापलं आहे.
नवी दिल्ली : देशभरातील वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये ११ दिवसांत चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. ...
आज सर्वोच्च न्यायालयात काय होणार?
आज होणाऱ्या सुनावणीत तपास प्रक्रियेवर, पुराव्यांच्या हाताळणीवर आणि प्रकरणातील कथित मानसिक छळाच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणाचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावा का, यावरही सुनावणीदरम्यान प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
देशभरातून संताप :
महिलांच्या सुरक्षिततेपासून मानसिक आरोग्यापर्यंत आणि विवाह संस्थेतील दबावापासून समाजाच्या दुटप्पी मानसिकतेपर्यंत अनेक मुद्दे या प्रकरणामुळे पुन्हा ऐरणीवर आले आहेत.