Twisha Sharma Case : “समाज काय म्हणेल?”च्या भीतीने गमावला जीव? आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ट्विशा शर्मा (Twisha Sharma Case) मृत्यू प्रकरणावर आज म्हणजेच सोमवार २५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या ट्विशाचा मृतदेह भोपाळमधील सासरी संशयास्पद परिस्थितीत आढळल्यानंतर या प्रकरणाने राष्ट्रीय पातळीवर मोठं वादळ निर्माण केलं आहे. मानसिक छळ, कौटुंबिक दबाव, हुंडा आणि “समाज काय म्हणेल?” या भीतीमुळे एका तरुणीचा जीव गेला का, असा प्रश्न आता देशभरातून उपस्थित केला जात आहे.



लग्नानंतर सुरू झाला होता मानसिक त्रास?


ट्विशाच्या (Twisha Sharma Case) कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यानुसार, लग्नानंतर काही दिवसांतच तिला मानसिक आणि भावनिक त्रासाला सामोरं जावं लागत होतं. हनिमूनदरम्यान पतीने गैरवर्तन केल्याची माहिती ट्विशाने आपल्या भावाला दिली होती. मात्र संसार टिकवण्यासाठी तिने सर्व सहन करण्याचा प्रयत्न केला.



ट्विशा (Twisha Sharma Case) आणि तिच्या आईमधील कथित व्हॉट्सअ‍ॅप चॅट्समध्ये ती वारंवार “मी या नात्यात अडकले आहे” असे सांगताना दिसते. तिने माहेरी परतण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र कुटुंबीयांनी तिला “थोडं अजून अॅडजस्ट कर” असा सल्ला दिल्याचं समोर आलं आहे.



“आम्ही तिला वाचवू शकलो नाही” :


ट्विशाच्या (Twisha Sharma Case) वडिलांनी एका मुलाखतीत मोठी कबुली दिली. “आम्ही तिला त्या घरातून बाहेर काढायला हवं होतं. आम्ही उशीर केला,” असे त्यांनी म्हटले. या वक्तव्यानंतर समाजातील विवाह आणि प्रतिष्ठेच्या दबावावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.



सासरच्या कुटुंबाकडून गंभीर आरोप :


ट्विशाच्या (Twisha Sharma Case) मृत्यूनंतर तिच्या सासूकडून अनेक धक्कादायक दावे करण्यात आले. ट्विशावर मानसिक अस्थिरता, नातेसंबंधांबाबत संशय आणि घरगुती जबाबदाऱ्या न पाळल्याचे आरोप करण्यात आले. यामुळे प्रकरण आणखी तापलं आहे.



दरम्यान, मानसोपचारतज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे की, कोणत्याही व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबाबत सार्वजनिकरित्या अंदाज बांधणे योग्य नाही. मृत व्यक्तीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करून प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही सोशल मीडियावर होत आहे. (Twisha Sharma Case)



आज सर्वोच्च न्यायालयात काय होणार?


आज होणाऱ्या सुनावणीत तपास प्रक्रियेवर, पुराव्यांच्या हाताळणीवर आणि प्रकरणातील कथित मानसिक छळाच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणाचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावा का, यावरही सुनावणीदरम्यान प्रश्न उपस्थित होऊ शकतात.



देशभरातून संताप :


ट्विशा शर्मा प्रकरणानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. “लग्न टिकवण्यासाठी मुलींनी सर्व सहन करावं का?” आणि “समाजाच्या भीतीपोटी किती ट्विशा बळी जाणार?” असे प्रश्न आता जोर धरत आहेत.


महिलांच्या सुरक्षिततेपासून मानसिक आरोग्यापर्यंत आणि विवाह संस्थेतील दबावापासून समाजाच्या दुटप्पी मानसिकतेपर्यंत अनेक मुद्दे या प्रकरणामुळे पुन्हा ऐरणीवर आले आहेत.




Comments
Add Comment

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी

VB-G-RAM-G च्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना २५ हजार ८६३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित

नवी दिल्ली : केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या

Child Protection Act : इंस्टाग्रामवरील बाल लैंगिक शोषणाच्या जाहिरातींप्रकरणी सरकारची मेटाला नोटीस

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इंस्टाग्रामवरील सशुल्क जाहिरातींद्वारे प्रसारित होणाऱ्या बाल लैंगिक शोषण आणि

ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत 125व्या क्रमांकावर घसरला

नवी दिल्ली : ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताची घसरण झाली असून देश 125व्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या