राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून पुढील दोन महिन्यांत अल निनोचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता असून नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो. मात्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात अद्यापही जोरदार पावसाचा इशारा कायम आहे. (Maharashtra Rain)
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Rain Updates)
याशिवाय, रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता स्थानिक प्रशासनाला आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Monsoon Update)
Jalgaon : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन (Green Maharashtra Mission) अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व भव्य ...
पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात. (Maharashtra Weather)
यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला होता. जूनच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, जूनअखेर आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्यांना वेग आला आणि राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली. मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची तूटही काही प्रमाणात भरून निघाली. (EL Nino Effect)
राजापूर : सुमारे साडेसात महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राजापूरची ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेली गंगामाई भर पावसाळयात पुन्हा प्रवाहित ...
तथापि, हवामान तज्ज्ञांच्या मते, ५ ऑगस्टनंतर राज्यातील पावसाचा जोर टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये अल निनोचा प्रभाव वाढल्याने पावसाचे प्रमाण घटू शकते. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत हवामानातील बदलांवर शेतकरी आणि नागरिकांनी लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Ghats Rains)