Bollywood News : बॉलिवूडच्या झगमगाटामागचं वास्तव! २० तास काम, तरीही मोबदला नाही; FWICE अध्यक्षांचा आरोप

मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) सुपरस्टार्सच्या मानधनाचे आकडे दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना त्यांच्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची भर पडत आहे. मात्र, दुसरीकडे ज्यांच्या मेहनतीच्या जोरावर संपूर्ण फिल्म इंडस्ट्री (Film Industry) उभी आहे, त्या पडद्यामागील तंत्रज्ञ (Technicians), स्पॉट बॉईज, लाईटमन आणि इतर कामगारांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. याच गंभीर समस्येकडे लक्ष वेधत 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉयज' (FWICE) चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला कठोर शब्दांत इशारा दिला आहे.



२०-२० तास काम, तरीही हक्काचा मोबदला मिळत नाही


ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना बी. एन. तिवारी यांनी चित्रपट आणि मालिका क्षेत्रात काम करणाऱ्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली. त्यांच्या मते, सध्या अनेक कामगारांकडून दिवसाला तब्बल २० ते २० तास काम करून घेतले जाते. या दीर्घ कामाच्या कालावधीत त्यांना पुरेशी विश्रांती किंवा ब्रेकदेखील दिला जात नाही. धक्कादायक बाब म्हणजे, इतके तास काम करूनही त्यांना किमान ८ तासांच्या कामाचे जे मूलभूत मानधन (Basic Payment) मिळायला हवे, तेही वेळेवर मिळत नाही. अनेक वेळा पूर्ण रक्कम न देता कामगारांची आर्थिक कोंडी केली जाते. परिणामी, पडद्यामागील हजारो कामगार आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.



OTT प्लॅटफॉर्म्सच्या वाढीमुळे दबाव आणखी वाढला


तिवारी यांनी सांगितले की, ओटीटी प्लॅटफॉर्म्स (OTT Platforms) आणि डिजिटल कंटेंटच्या वाढत्या स्पर्धेमुळे निर्मात्यांचा भर दर्जेदार कामापेक्षा अधिकाधिक आऊटपुट (Output) मिळवण्यावर राहिला आहे. त्यामुळे कामगारांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. घरखर्च भागवण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक कामगार कमी मानधनावरही काम करण्यास भाग पडतात. निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसेस याच परिस्थितीचा फायदा घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खराब कामाचे वातावरण, अपुरी सुविधा आणि विलंबाने होणारे पेमेंट या समस्यांचा सामना कामगारांना रोज करावा लागत आहे.



काम पूर्ण झाल्यावर निर्माता गायब होण्याचेही प्रकार


बी. एन. तिवारी यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. अनेक वेळा एखाद्या प्रोजेक्टचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित निर्मिती संस्था किंवा निर्माता संपर्काबाहेर जातो. परिणामी, कामगारांचे थकीत पैसे अडकून राहतात. अनेकांना महिनोनमहिने त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळत नाही. त्यांनी सांगितले की, मोठे कलाकार त्यांच्या निश्चित वेळेनुसार शिफ्ट पूर्ण करून घरी निघून जातात. मात्र, सेटवरील शेवटचा दिवा बंद होईपर्यंत स्पॉट बॉईज, लाईटमन, तांत्रिक कर्मचारी आणि इतर मजूर वर्ग काम करत राहतो. चित्रपटसृष्टीचा खरा पाया असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.



"परिस्थिती बदलली नाही तर हिंदी चित्रपटसृष्टी बंद पडू शकते"


कामगारांच्या हक्कांकडे आणि त्यांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष सुरूच राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण उद्योगाला भोगावे लागू शकतात, असा इशारा बी. एन. तिवारी यांनी दिला. "जर परिस्थिती अशीच कायम राहिली, तर एक दिवस संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी (Hindi Film Industry) ठप्प होईल. हजारो कामगार बेरोजगार होतील आणि अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते," अशा शब्दांत त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटामागे रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या कामगारांचे प्रश्न आता ऐरणीवर आले असून, त्यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा पहिला नवरा कोण ? तुम्हांला माहिती आहे का ? गौरी स्प्रॅटच्या एक्स हजबंडबद्दल जाणून घ्या

Gauri Spratt Ex-Husband : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक

Aamir khan 3rd wedding: मुसळधार पावसामुळे अंबानी कुटुंबाचा ताफा काही काळ थांबला; आमिर खानच्या विवाह सोहळ्यासाठी जाताना घडली घटना

मुंबई : रविवारी मुंबईत दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला.

Aamir Khan Wedding : आमिर खान-गौरी स्प्रॅटचा खासगी विवाहसोहळा; फक्त १०० ते १५० पाहुण्यांना निमंत्रण, 'ते' दोन खास मित्र चर्चेत

मुंबई : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट'(Mr. Perfectionist) आमिर खान ५ जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत विवाहबंधनात

Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची बदनामी? आक्षेपार्ह थंबनेल वापरणाऱ्या युट्यूब चॅनेल्सवर सचिन गोस्वामी संतप्त!

मुंबई : लोकप्रिय विनोदी कार्यक्रम (Comedy Show) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' संदर्भात सोशल मीडिया (Social Media) आणि युट्यूब (YouTube) वर

Lock Upp 2 : राम कपूरच्या 'त्या' एका वक्तव्यावर कंगना भडकली! भर शोमध्ये अभिनेत्याला सुनावले खडेबोल; पाहा नेमकं काय घडलं...

Lock Upp 2 : लोकप्रिय अभिनेता राम कपूर (Ram kapoor) सध्या 'लॉकअप २' (Lock UPp 2) या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. शोमध्ये केलेल्या काही