Bollywood News : बॉलिवूडच्या झगमगाटामागचं वास्तव! २० तास काम, तरीही मोबदला नाही; FWICE अध्यक्षांचा आरोप

मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) सुपरस्टार्सच्या मानधनाचे आकडे दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना त्यांच्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची भर पडत आहे. मात्र, दुसरीकडे ज्यांच्या मेहनतीच्या जोरावर संपूर्ण फिल्म इंडस्ट्री (Film Industry) उभी आहे, त्या पडद्यामागील तंत्रज्ञ (Technicians), स्पॉट बॉईज, लाईटमन आणि इतर कामगारांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. याच गंभीर समस्येकडे लक्ष वेधत 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉयज' (FWICE) चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला कठोर शब्दांत इशारा दिला आहे.



२०-२० तास काम, तरीही हक्काचा मोबदला मिळत नाही


ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना बी. एन. तिवारी यांनी चित्रपट आणि मालिका क्षेत्रात काम करणाऱ्या रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली. त्यांच्या मते, सध्या अनेक कामगारांकडून दिवसाला तब्बल २० ते २० तास काम करून घेतले जाते. या दीर्घ कामाच्या कालावधीत त्यांना पुरेशी विश्रांती किंवा ब्रेकदेखील दिला जात नाही. धक्कादायक बाब म्हणजे, इतके तास काम करूनही त्यांना किमान ८ तासांच्या कामाचे जे मूलभूत मानधन (Basic Payment) मिळायला हवे, तेही वेळेवर मिळत नाही. अनेक वेळा पूर्ण रक्कम न देता कामगारांची आर्थिक कोंडी केली जाते. परिणामी, पडद्यामागील हजारो कामगार आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.



OTT प्लॅटफॉर्म्सच्या वाढीमुळे दबाव आणखी वाढला


तिवारी यांनी सांगितले की, ओटीटी प्लॅटफॉर्म्स (OTT Platforms) आणि डिजिटल कंटेंटच्या वाढत्या स्पर्धेमुळे निर्मात्यांचा भर दर्जेदार कामापेक्षा अधिकाधिक आऊटपुट (Output) मिळवण्यावर राहिला आहे. त्यामुळे कामगारांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. घरखर्च भागवण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक कामगार कमी मानधनावरही काम करण्यास भाग पडतात. निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसेस याच परिस्थितीचा फायदा घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खराब कामाचे वातावरण, अपुरी सुविधा आणि विलंबाने होणारे पेमेंट या समस्यांचा सामना कामगारांना रोज करावा लागत आहे.



काम पूर्ण झाल्यावर निर्माता गायब होण्याचेही प्रकार


बी. एन. तिवारी यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. अनेक वेळा एखाद्या प्रोजेक्टचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित निर्मिती संस्था किंवा निर्माता संपर्काबाहेर जातो. परिणामी, कामगारांचे थकीत पैसे अडकून राहतात. अनेकांना महिनोनमहिने त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळत नाही. त्यांनी सांगितले की, मोठे कलाकार त्यांच्या निश्चित वेळेनुसार शिफ्ट पूर्ण करून घरी निघून जातात. मात्र, सेटवरील शेवटचा दिवा बंद होईपर्यंत स्पॉट बॉईज, लाईटमन, तांत्रिक कर्मचारी आणि इतर मजूर वर्ग काम करत राहतो. चित्रपटसृष्टीचा खरा पाया असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.



"परिस्थिती बदलली नाही तर हिंदी चित्रपटसृष्टी बंद पडू शकते"


कामगारांच्या हक्कांकडे आणि त्यांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष सुरूच राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण उद्योगाला भोगावे लागू शकतात, असा इशारा बी. एन. तिवारी यांनी दिला. "जर परिस्थिती अशीच कायम राहिली, तर एक दिवस संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी (Hindi Film Industry) ठप्प होईल. हजारो कामगार बेरोजगार होतील आणि अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते," अशा शब्दांत त्यांनी आपली चिंता व्यक्त केली. हिंदी फिल्म इंडस्ट्रीच्या झगमगाटामागे रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या कामगारांचे प्रश्न आता ऐरणीवर आले असून, त्यावर तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment

Sankarshan Karhade : बापासाठी यापेक्षा मोठी कमाई काय असू शकते! संकर्षण कऱ्हाडेने व्यक्त केल्या खास भावना

मुंबई : 'आम्ही सारे खवय्ये' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ' यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या

Abhishek & Aishwarya ; बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीचा न्यूयॉर्क मधील फोटो व्हायरल, विभक्त होण्याच्या चर्चांना पूर्णविराम !

मुबई : अलीकडेच, बॉलीवूड मधील प्रसिद्ध स्टार ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन न्यूयॉर्कमध्ये सुट्टी घालवताना दिसले

"तू माझ्या आयुष्यातली सर्वांत कुरूप महिला..."; पतीच्या या बोलण्यावर दिग्गज अभिनेत्रीचा मोठा खुलासा, दोन दशकांपासून राहत आहेत वेगळे

'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'जमाई राजा' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांमध्ये पोहोचलेल्या दिग्गज आणि

Aishwarya Thackeray : राजकारण नाही, आता रुपेरी पडद्यावर एन्ट्री! बाळासाहेब ठाकरेंचा नातू YRF च्या बिग बजेट चित्रपटात झळकणार

मुंबई : ठाकरे कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्याऐवजी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय

Salman Khan : सलमान खानच्या मध्यरात्रीच्या पोस्टने उडवली खळबळ; 'डर गया... मर गया' म्हणत नेमकं काय सांगितलं?

मुंबई : बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा सोशल मीडिया (Social Media) पोस्टमुळे चर्चेत आला आहे. दिल्लीतील

Marathi Movie : "मामाच्या गोव्याला जाऊया" चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; अंकुश चौधरीचा खतरनाक 'डॉन' अवतार अन् तगडी स्टारकास्ट!

बॉलीवूडच्या 'धम्माल'ला देणार टक्कर! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलरमध्ये कॉमेडी, सस्पेन्स अन् ॲक्शनचा