मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता दिग्दर्शित हा सर्वनाश करणारा झोम्बी थ्रिलर असून, चित्रपटाचा मोठा भाग ऑस्ट्रेलियात शूट करण्याचे नियोजन यापूर्वी करण्यात आले होते. मात्र, आता या शूटिंग शेड्यूलमध्ये बदल करून काही भाग मुंबईत हलवण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे. या बदलामागे रणवीर सिंगची वैयक्तिक परिस्थितीही एक महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार ...
रिपोर्टनुसार, रणवीर सिंग पत्नी दीपिका पदुकोण आणि त्यांच्या वाढत्या कुटुंबाच्या जवळ राहू इच्छितो. रणवीर आणि दीपिका आपल्या दुसऱ्या अपत्याच्या स्वागताची तयारी करत आहेत. त्यामुळे शूटिंगसाठी दीर्घकाळ ऑस्ट्रेलियात राहण्याऐवजी मुंबईत राहून काम करण्याचा पर्याय अधिक सोयीचा ठरू शकतो. मात्र, या बदलाबाबत निर्माते किंवा रणवीरकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, केवळ वैयक्तिक कारणामुळेच शूटिंगचे ठिकाण बदलले जात असल्याचे निश्चित झालेले नाही. काही रिपोर्ट्समध्ये ऑस्ट्रेलियातील विशिष्ट लोकेशन्ससाठी आवश्यक परवानग्या मिळवण्याशी संबंधित अडचणीही असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे वैयक्तिक आणि प्रॉडक्शनशी संबंधित दोन्ही कारणांचा विचार करून मुंबईला पर्याय म्हणून निवडले जात असल्याची चर्चा आहे.
‘प्रलय’ हा रणवीरच्या कारकिर्दीतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. सुमारे ३०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार होत असल्याचे रिपोर्ट्स आहेत. पोस्ट-अॅपोकॅलिप्टिक मुंबईच्या पार्श्वभूमीवर एका विवाहित जोडप्याच्या अस्तित्वाच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून मांडली जाणार असल्याचे सांगितले जाते. झोम्बी थ्रिलरच्या माध्यमातून रणवीर पहिल्यांदाच या प्रकारच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात रणवीरसोबत कल्याणी प्रियदर्शन दिसणार असल्याचेही रिपोर्ट्स आहेत. हा VFX-प्रधान प्रकल्प असून, त्यासाठी रणवीरकडून विशेष शारीरिक आणि भावनिक तयारी केली जात असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. जुलैमध्ये रणवीरने मुंबईतील हंसल मेहता यांच्या कार्यालयात जाताना आपला नवा लूक पापाराझींपासून लपवला होता, त्यामुळे ‘प्रलय’मधील त्याच्या भूमिकेबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.
मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत म्हणजेच Wordmark मध्ये मोठा बदल केला आहे. कंपनीने ...
सध्या चित्रपटाच्या निर्मितीबाबत अंतिम वेळापत्रक आणि ऑस्ट्रेलिया-मुंबई शूटिंगचे प्रमाण अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, रणवीरच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच त्याच्या करिअरमधील या मोठ्या प्रोजेक्टकडेही चाहत्यांचे लक्ष लागले आहे.