Harbour Line AC Local Train : मुंबईकरांचा AC लोकलकडे वाढता कल! हार्बर लाईनवरील प्रवासी संख्या तब्बल ६५ टक्क्यांनी वाढली

मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) हार्बर मार्गावरील वातानुकूलित उपनगरी लोकल सेवांना मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र समोर आले आहे. आरामदायी, वेगवान आणि प्रीमियम प्रवासाच्या पर्यायाकडे प्रवाशांचा वाढता ओढा स्पष्टपणे दिसून येत असून, हार्बर लाईनवरील AC लोकलमधील प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. (Harbour Line AC Local Train)



हार्बर लाईनवर AC लोकलला प्रवाशांची पसंती :


Mumbai Suburban Railway च्या हार्बर मार्गावर वातानुकूलित उपनगरी सेवा २६ जानेवारी २०२६ रोजी सुरू करण्यात आल्या होत्या. सुरुवातीपासूनच या सेवांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र गेल्या काही महिन्यांत वाढत्या उकाड्यामुळे आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर AC लोकलची लोकप्रियता आणखी वाढली आहे. (Harbour Line AC Local Train)



प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १ मे २०२६ पासून हार्बर मार्गावर १४ अतिरिक्त वातानुकूलित सेवा सुरू केल्या. त्यामुळे आता मध्य रेल्वेच्या एकूण AC लोकल सेवांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. यामध्ये मेन लाईनवरील ८० आणि हार्बर लाईनवरील २८ सेवांचा समावेश आहे. (Harbour Line AC Local Train)



प्रवासी संख्येत तब्बल 65 टक्क्यांची वाढ :


मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, हार्बर लाईनवरील AC लोकल सेवांमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत AC लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २.३४ लाख होती. तर १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत ही संख्या थेट ३.८६ लाखांपर्यंत पोहोचली. म्हणजेच अवघ्या १५ दिवसांत प्रवासी संख्येत तब्बल ६४.९७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. (Harbour Line AC Local Train)



महसुलातही मोठी झेप :


प्रवासी वाढीसोबतच मध्य रेल्वेच्या महसुलातही मोठी वाढ झाली आहे. हार्बर लाईनवरील AC लोकलमधून मिळणारा महसूल १.१८ कोटी रुपयांवरून वाढून १.९६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. महसुलात तब्बल ६६.४३ टक्क्यांची वाढ झाल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले. या वाढत्या आकडेवारीमुळे मुंबईकर प्रीमियम प्रवास सुविधांना प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होत आहे. (Harbour Line AC Local Train)



वाढत्या उकाड्यामुळे AC लोकलला मागणी :


सध्या Mumbai आणि उपनगरांमध्ये उष्णता आणि दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गर्दीने भरलेल्या सामान्य लोकलच्या तुलनेत AC लोकल अधिक आरामदायी वाटत असल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि महिला प्रवाशांचा कल या सेवेकडे वाढत आहे. विशेषतः कार्यालयीन वेळेत AC लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचेही दिसून येत आहे. (Harbour Line AC Local Train)



तिकीट तपासणी मोहीम आणखी कडक :


दरम्यान, वातानुकूलित लोकलमध्ये तिकीटविना प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. रेल्वे प्रशासनाकडून स्थानकांवर आणि AC लोकलमध्ये नियमित तपासणी केली जात असून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. यामुळे प्रामाणिक प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Harbour Line AC Local Train)



मुंबईच्या प्रवास व्यवस्थेत मोठा बदल?


मुंबईच्या उपनगरी रेल्वे नेटवर्कमध्ये AC लोकल हा आता केवळ ‘लक्झरी’ पर्याय न राहता गरज बनत चालल्याचे चित्र दिसत आहे. भविष्यात हार्बर मार्गावर आणखी AC सेवा वाढवल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक आरामदायी होण्याची अपेक्षा आहे. (Harbour Line AC Local Train)

Comments
Add Comment

Sejal Pawar : एमबीबीएस विद्यार्थिनीकडून रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीपत्र सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय व के. ई. एम. रुग्णालयातील एमबीबीएस

Sejal Pawar Controversy : मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही, कारवाई होणारच

वैद्यकीय विद्यार्थिनी सेजल पवार प्रकरणावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया मुंबई (विशेष

Devendra Fadnavis : अल निनोचा मोठा परिणाम राज्यावर होईल, टास्क फोर्स तयार

मुंबई : अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. या संदर्भात आपण तयारी करत आहोत. आपण त्याचा टास्क फोर्स तयार

Devendra Fadnavis : गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कठोर कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात दिले होते स्पष्ट संकेत अन्न व औषध प्रशासन मार्फत अत्यंत

Dahanu Love Jihad : डहाणू लव्ह जिहाद प्रकरणी डीसीपी मीना मकवानांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना

एसआयटी स्थापनेसाठी आमदार चित्रा वाघ यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे

Devendra Fadnavis : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा १०० टक्के सौर ऊर्जेवर आणणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पाणीपुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी तालुकास्तरावर युनिटची निर्मिती मुंबई :